शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

दहशतवाद पसरवणाऱ्या सनातन संस्थेवर बंदी आणा; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2019 11:45 AM

नाणार, आरे आंदोलकांबाबत सरकारने घेतलेले निर्णयाने आनंद झाला

नवी दिल्ली - राज्यात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादीचं सरकार आल्यानंतर अनेक मागण्यांना जोर येऊ लागला आहे. अशातच सनातन संस्थेबाबतही सरकारने भूमिका घ्यावी, दहशतवाद पसरविण्याचं काम सनातन करते. मालेगाव दंगलीत सर्व पुरावे असताना प्रज्ञा ठाकूरला भाजपाने खासदार केले हे अतिशय वाईट बाब आहे. दहशतवाद पसरविणारा कोणत्याही समाजाचा असो त्याला शिक्षा व्हायला हवी. सनातन संस्थेवर बंदी आणावी अशी मागणी हुसेन दलवाई यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

याबाबत बोलताना हुसेन दलवाई एबीपी माझाशी बोलताना म्हणाले की, नाणार, आरे आंदोलकांबाबत सरकारने घेतलेले निर्णयाने आनंद झाला. भीमा-कोरेगाव प्रकरणात काही जणांना गोवण्याचे काम सुरु आहे. त्याबाबत निर्णय घ्यावा लागेल. संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे या दोघांचा सहभाग भीमा-कोरेगावमध्ये होता. त्यांच्यामुळेच दंगली घडल्या. सांगलीच्या दंगलीवेळी जंयत पाटील यांनी भिडेंची बाजू घेतली होती. त्यामुळे मी जयंत पाटलांनी भिडेंची बाजू घेऊ नये असं सांगणार आहे. भिडे-एकबोटे यांना अद्दल घडविली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच  शिवसेनेने सनातन धर्म संस्थेला कधी पाठिंबा दिला नाही. महाराष्ट्रात शांतता ठेवायची असेल तर अशा लोकांवर कारवाई घ्यायला हवी. काँग्रेस काळात अंमलबजावणी झाली नाही ती आमची चूक होती. महाराष्ट्रात पुरोगामी सरकार आलेले आहे. आता याबाबत स्पष्ट भूमिका घेतली पाहिजे. दाभोलकर, पानसरे यांच्यासारखी माणसं मारली जातात, त्याच्यामागे कोण सूत्रधार आहे ते शोधून काढलं पाहिजे. सनातन संस्थेचे जे लोक बोलतात त्यावरुन हे स्पष्ट होतंय, सरकार नक्की या संबंधात विचार करतील असा विश्वास काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांनी केला. 

महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारताच मेट्रोच्या आरेमधील कारशेडला स्थगिती दिली होती. यानंतर आंदोलकांवरील गुन्हेही रद्द केले होते. तसेच भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी केली होती. यावर उद्धव ठाकरेंनी सकारात्मक पाऊल उचलले होते. आता राष्ट्रवादीच्या विधानपरिषद आमदारांनंतर धनंजय मुंडेंनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत भीमा कोरेगाव दंगल प्रकरणी गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.  

टॅग्स :congressकाँग्रेसShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanatan Sansthaसनातन संस्थाHussein Dalwaiहुसेन दलवाई