शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
2
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
3
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
4
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
5
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
6
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
7
Israel-Hamas War : इस्त्रायलचा रफाह शहरावर हवाई हल्ला; १३ जणांचा मृत्यू, अनेक जखमी
8
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
9
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
10
"काय गं तुला खूप माज आलाय का?", जुई गडकरीला तरुणीकडून धमकी; अभिनेत्री म्हणाली, आता थेट पोलीस…
11
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
12
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
13
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
14
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
15
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
16
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
17
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
18
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
19
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
20
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत

1 जानेवारी 2022 पासून 'या' राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत पाणी विकण्यावर बंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2021 6:59 PM

राज्य सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले आहे.

आज संपूर्ण जग प्रदुषणामुळे त्रस्त आहे. या प्रदुषणातून मुक्त होण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. पण, पृथ्वीवरील प्रदुषण एकदम नष्ट होणे सोपी गोष्ट नाही. दरम्यान, या प्रदुषणातून काहीसा दिलासा मिळवण्यासाठी एका राज्याने मोठा निर्णय घेतला आहे. सिक्कीम सरकारने राज्यात प्लास्टिकच्या बाटलीत दिल्या जाणाऱ्या पाण्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

सिक्कीम सरकारने पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलले असून, येत्या 1 जानेवारी 2022 पासून सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्कीमच्या अनेक भागात बांबूच्या बाटल्या वापरल्या आहेत. पर्यावरण वाचवण्यासाठी सिक्कीमचे हे पाऊल कौतुकास्पद आहे. 

याबाबत सिक्कीमचे मुख्यमंत्री पी एस तमांग यांनी सांगितले की, राज्यात अनेक नैसर्गिक स्त्रोत आहेत जिथे ताजे आणि चांगल्या दर्जाचे पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. सिक्कीम या दिशेने उत्कृष्ट काम करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, सिक्कीममध्ये प्लास्टिकच्या बातमीवर बंदी घातल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी नैसर्गिक स्त्रोतांमधून पाणी देण्याचा प्रयत्न केला जाईल. गांधी जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. आता हा निर्णय किती योग्य ठरेल, हे येणारा काळच ठरवेल. 

टॅग्स :sikkimसिक्किमWaterपाणी