शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
वर्ल्ड बँकेकडून पाकिस्तानला ७०० मिलियन डॉलर्ची 'खैरात', भारताच्या विरोधानंतरही मिळाले कर्ज
3
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
4
"तुम्ही एक कोटी देताय; मी एअर इंडियाला दोन कोटी देते, माझे वडील परत द्या"; बाप गमावला, मुलीच्या अश्रूंचा फुटला बांध
5
झापुक-झुपुक...! देशी कंपनीने एकाचवेळी दोन स्वस्त ५जी फोन लाँच केले, स्मार्टफोन मार्केटमध्ये अजून काय हवे...
6
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
7
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
8
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
9
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
10
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
11
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
12
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
13
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
14
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
15
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
16
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
17
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
18
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
19
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
20
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस

चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांवर बंदी घाला, हरीत लवादाकडे शेतकऱ्याची याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2022 11:46 IST

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे.

पुणे/मुंबई - सध्या देशात सण आणि उत्सवांची चलती दिसत असून गौरी गणपीनंतर आता दसऱ्याची धूम सगळीकडे पाहायला मिळत आहे. नवरात्री उत्सवातही बाजारपेठा फुलल्या आहेत. कोविडच्या दोन वर्षानंतर बाजारात उत्साह दिसून येत असल्याने शेतकरी वर्गही खुश आहे. मात्र, फुल उत्पादक शेतकऱ्यांमध्ये काहीशी नाराजी असून चीनी बनावटीच्या प्लास्टीक फुलांनी बाजार व्यापल्याने शेतकरी चिंतेत आहे. त्यातच, पुण्यातील एका शेतकऱ्याने हरीत लवादाकडे प्लास्टीक फुलांवर बंदी आणण्याची मागणी केली आहे. त्यावर, प्रदूषण मंडळाला म्हणणे सादर करण्याचे निर्देश हरीत लवादाने दिले आहेत.  

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे देशांतर्गत बाजारात सर्वच फुलांच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण आहे. सणासुदीच्या काळात जाई, जुई, मोगरा, अबोली, झेंडू, अॅस्टर, शेवंती, गॅलार्डिया आदींच्या सुट्या व लॅडओलस, गुलाब, जरबेरा, कार्नेशन, ऑर्केड्स, अॅन्थुरियम या दांड्याच्या फुलांना  प्रचंड मागणी असते. मात्र, प्लास्टिक फुलांचा वापर विविध समारंभांत वाढला आहे. याचा परिणाम म्हणून बाजारात नैसर्गिक फुलांचे दर गडगडले आहेत. त्याचा सर्वाधिक फटका देशातील फूल उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. त्यामुळेच, राहुल पवार या शेतकऱ्याने हरीद लवादाकडे धाव घेतली आहे. 

राहुल पवार यांनी अॅड. सुधाकर आव्हाड, अॅड चेतन नागरे, अॅड. सिद्धी मिरगे यांच्यामार्फत हरीत लवादात याचिका दाखल केली. या याचिकेवर झालेल्या सुनावणीत केंद्रीय प्रदूषण महामंडळाला म्हणणे सादर करण्याचे निर्देश हरीद लवादाने दिले आहेत. न्यायमूर्ती दिनेशकुमार सिंग व सदस्य विजय कुलकर्णी यांनी हे आदेश दिले आहेत. यासंदर्भात नागरे यांनी माहिती दिली. 

शासनाने व पर्यावरण विभागाने १०० मायक्रॉनच्या आतील पॉलिथीन प्लास्टीक वापरास बंदी घातली आहे. मात्र, सध्या बाजारात उपलब्ध असलेली प्लास्टीकची फुले ही २९ मायक्रॉनची असल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. ही फुले खराब झाल्यानंतर कचऱ्यात टाकण्यात येतात. फुलांच्या रिसायकलची प्रक्रिया अस्तित्वात नाहीत. याशिवाय या फुलांचा रंग पर्यावरणासाठी घातक असल्याचेही याचिकेत म्हटले आहे. 

राजू शेट्टींनीही केली मागणी

चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांमुळे देशातील फूल उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात आहे. लॅाकडाऊननंतर स्थिरस्थावर होण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या उत्पादकांना चिनी बनावटीच्या प्लास्टिक फुलांच्या आयातीमुळे फटका बसत आहे. फूलशेती तोट्यात आहे. केंद्र सरकारने चिनी प्लास्टिक फुलांच्या वापरावर व आयातीवर तातडीने बंदी घालवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे गत महिन्यात केली होती. 

टॅग्स :environmentपर्यावरणministerमंत्रीFarmerशेतकरीPuneपुणेCourtन्यायालय