शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

बलवीर गिरी असतील नरेंद्र गिरी यांचे उत्तराधिकारी, पंच परमेश्वरांनी घेतला निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 12:16 IST

Mahant Narendra Giri: महंत बलवीर गिरी यांना श्री बाघंब्री मठाच्या गादीवर बसवले जाईल.

प्रयागराज: अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष दिवंगत महंत नरेंद्र गिरी यांच्या वारसदारावर निर्णय घेण्यात आला आहे. नरेंद्र गिरी यांचे शिष्य बलवीर गिरी यांना महंत नरेंद्र गिरी यांचा उत्तराधिकारी घोषित करण्यात आलं आहे. आखाडा परिषदेच्या पंच परमेश्वरांनी नरेंद्र गिरी यांच्या इच्छेनुसार हा निर्णय घेतला आहे. येत्या 5 ऑक्टोबर रोजी बाघंब्री मठाची जबाबदारी बलवीर गिरी यांच्याकडे सोपवली जाईल.

महंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यूनंतर त्यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली होती, ज्यात त्यांनी बलवीर गिरी यांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले होते. पण मठाच्या पंच परमेश्वरांनी सुसाइड नोट बनावट असल्याचं सांगून बलवीर गिरी यांना त्यांचा उत्तराधिकारी बनवण्यास नकार दिला होता. यानंतर नरेंद्र गिरी यांची जून 2020 मध्ये तयार केलेल्या मृत्यूपत्राचा खुलासा झाला, ज्यात त्यांनी बलवीर गिरींना त्यांचा उत्तराधिकारी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्या आधारावर बलवीर गिरी यांना मठाची जबाबदारी देण्यात येणार आहे.

मृत्यूपत्रात झाला खुलासामहंत नरेंद्र गिरी यांनी तीन मृत्युपत्रे केली होती. पहिल्या मृत्यूपत्रात त्यांनी बलवीर गिरी यांना त्यांचे उत्तराधिकारी बनवले. यानंतर, 2011 मध्ये दुसरे मृत्युपत्र बनवले, ज्यात आनंद गिरी यांना उत्तराधिकारी बनवले. पण, आनंद गिरी यांच्याशी झालेल्या वादानंतर त्यांनी आधीचे दोन्ही मृत्यूपत्र रद्द केले आणि तिसरे मृत्युपत्र केले, ज्यामध्ये त्यांनी पुन्हा बलवीर गिरींना उत्तराधिकारी बनवले होते.

सीबीआयचा तपास सूरूमहंत नरेंद्र गिरी यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणी सीबीआयकडून तपास केला जातोय. सीबीआय चौकशीचा बुधवारी पाचवा दिवस आहे, तर आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या आरोपींची चौकशी करण्याचा हा दुसरा दिवस आहे. सीबीआय आजही आरोपींची चौकशी करत राहील. पोलीस लाईन्सच्या गंगा गेस्ट हाऊसमध्ये सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी काल आनंद गिरी, आध्याप्रसाद तिवारी आणि संदीप तिवारी यांची स्वतंत्रपणे सात तास चौकशी केली. या चौकशीत सीबीआयला अनेक महत्त्वाचे संकेत मिळाले आहेत. 

इतर नावांचाही खुलासामहंत नरेंद्र गिरी यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये ज्या व्हिडीओचा उल्लेख केला आहे त्याबद्दल सीबीआयला सुगावा मिळाला आहे. सीबीआयच्या प्राथमिक तपासात इतर अनेक लोकांची नावेही समोर येत आहेत. आता सीबीआय आरोपपत्रात इतर आरोपींची नावे समाविष्ट करेल. यासह, मुख्य आरोपी आनंद गिरी आणि इतर आरोपींविरोधातही कलमे वाढवली जाऊ शकतात. सीबीआयने ठोस पुरावे गोळा केले तर आरोपीला दहा वर्षांची शिक्षा होऊ शकते.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी