शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भारीच! शेतकरी वडिलांच्या हत्येने लेक हादरला; IAS होण्याचा निर्णय घेतला; 'असा' होता यशस्वी प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 11:31 IST

यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यात राहणाऱ्या बजरंग यादवची प्रेरणादायी गोष्ट आता समोर आली आहे. बजरंगने देशातील नागरी सेवा परीक्षेत 454 वा रँक मिळवला आहे आणि संपूर्ण जिल्ह्याचं नाव मोठं केलं आहे. यूपीएससी परीक्षेत यश मिळवण्याचा प्रवास बजरंग यादवसाठी अजिबात सोपा नव्हता, पण वडिलांच्या निधनानंतर त्याने ठरवलं की यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन आयएएस अधिकारी व्हायचं आहे. 

आज तकशी संवाद साधताना बजरंगने सांगितले की, 'माझे वडील राजेश यादव हे व्यवसायाने शेतकरी होते. ते गावातील शेतीसोबतच गरीब, असहाय्य लोकांना मदत करत असत. माझ्या वडिलांचे हे काम काही लोकांना आवडलं नाही आणि त्यांनी 2020 मध्ये माझ्या वडिलांची कट रचून हत्या करण्यात आली. या घटनेने मला हादरवून सोडलं, त्यानंतर मी आयएएस होण्याचा निर्णय घेतला. मेहनतीचे फळ मिळाले आणि देशभरातून यूपीएससी परीक्षेत 454 वा रँक मिळाला.

बजरंगला ४ भाऊ आणि एक बहीण आहे, ज्यामध्ये अंबिका यादव घरातील कामे पाहते.  बजरंगच्या या यशावर आजी रेश्मा देवी, काका दिनेश यादव, काका उमेश यादव, काकू सुमनदेवी, मंजू देवी यांनी आनंद व्यक्त केला आहे. बजरंगचे प्राथमिक शिक्षण गावातूनच झाले. दहावीची परीक्षा लिटल फ्लॉवर स्कूल कलवारी येथे तर इंटरमिजिएटची परीक्षा उर्मिला एज्युकेशनल अकॅडमी बस्ती येथे झाली. 

2019 मध्ये, त्याने अलाहाबाद विद्यापीठातून B.Sc Maths केले आणि दिल्लीत UPSC ची तयारी करत होता. बजरंगच्या या यशानंतर लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बजरंग म्हणाला की, "गरिबांची सेवा करणे हे माझे ध्येय आहे. माझ्या वडिलांसोबत घडलेल्या घटनेत मला असे दिसून आले की, गरीब आणि असहाय्य लोकांना मोठा अधिकारीच मदत करू शकतो. प्रत्येकजण एक समस्या सोडवण्यासाठी आयएएस होऊ शकत नाही, परंतु एखादी व्यक्ती आयएएस होऊन अनेक प्रश्न सोडवू शकते." 

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी