शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

आरोपींना फाशीचीच शिक्षा हवी, बजरंग सोनवणेंची मागणी; सरपंच हत्या प्रकरणाचा मुद्दा संसदेत गाजला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2024 19:08 IST

हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे.

Bajrang Sonwane ( Marathi News ) :बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचे पडसाद राज्यभरात उमटत असताना बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी हा मुद्दा लोकसभेत उपस्थित केला आहे. संतोष देशमुख यांच्या क्रूर खून प्रकरणातील सर्व मारेकऱ्यांना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी खासदार सोनवणे यांनी संसदेत केली.

"बीड जिल्ह्यातील हे प्रकरण देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील मोठा आघात आहे आणि दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही," अशी भूमिकाही बजरंग सोनवणे यांनी घेतली आहे. त्यामुळे या प्रकरणातील सातपैकी फरार असलेल्या चार आरोपींना लवकरात लवकर अटक होणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

विधिमंडळात विरोधक आक्रमक

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आज सुरुवात होताच विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली. तसंच या प्रकरणात दानवे यांनी धनंजय मुंडे यांचंही नाव घेतलं. त्यानंतर सरकारची बाजू मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंडे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं.

अंबादास दानवे यांच्या आरोपांनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते १४ कोटी जनतेपर्यंत जात असतं. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे आपण ज्यावेळी बोलतो, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतो. अशा मंत्र्यांवरही कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो," असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसंच सरकारवर सरकारी पक्षातील, विरोधी पक्षातील कोणाचाही आरोपीला वाचवा, असा दबाब आलेला नाही. आम्ही यामध्ये आरोपींचा शोध घेण्यासाठी टेक्निकल आणि आर्टिफिशअल इंटेलिजन्सचा वापर करू, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.   पोलिसांची निष्क्रियता

केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या करणाऱ्या आरोपींच्या नातेवाइकांची शनिवारी केज पोलिस ठाण्यात आणून चौकशी करण्यात आली. तसेच अटक असलेल्या आणि सीआयडीकडे सुपूर्द केलेल्या आरोपींचीही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी चौकशी सुरू केली आहे. असे असले तरी अजूनही चार आरोपी मोकाटच आहेत. तसेच परळी अहपरण, बीडमधील गोळीबार आणि केजमधील खून व खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीही मोकाटच आहेत. या घटनांना चार ते पाच दिवसांचा कालावधी उलटूनही आरोपी मिळत नसल्याने पोलिसांचे नेटवर्क कमी पडतेय का? असा प्रश्न आहे. सरंपच देशमुख हत्येच्या निषेधार्थ शुक्रवारी जिल्हाभरात कडकडीत बंद पाळण्यात आला. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारलेल्या या बंदमध्ये सर्वच समाजांनी आणि राजकीय, सामाजिक संघटनांनी सहभाग नोंदविला. व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवले. शाळा, महाविद्यालयेही बंद ठेवली होती. शुक्रवारी दिवसभरात हा बंद शांततेत पाळला होता. यातील आरोपींवर कठोर कारवाई करावी, मास्टरमाईंड शोधावा, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. असे असले तरी पोलिसांच्या हाती या हत्या प्रकरणात केवळ तीनच आरोपी लागलेले आहेत. अजूनही चार आरोपी मोकाटच आहेत. सध्या हा तपास सीआयडीकडे वर्ग केला असला तरी आरोपी शोधासाठी बीड पोलिसही धावपळ करत आहेत. परंतु त्यांना अद्याप यश आलेलं नाही.

टॅग्स :Beedबीडbajrang sonwaneबजरंग सोनवणेCrime Newsगुन्हेगारीDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेसbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरण