शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

खराब रस्त्यांमुळे होतात अपघात; दरवर्षी 1.5 लोकांचा मृत्यू; नितीन गडकरींनी दिली मोठी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 20:03 IST

Road Engineering: अपघातातील मृतांपैकी 60 टक्के 18 ते 34 वयोगटातील, हे देशासाठी चांगले नाही.

Poor Road Engineering: दरवर्षी भारतात लाखो अपघात होतात, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. यातील प्रत्येत अपघाताचे कारण वेगवेगळे असू शकते. यातील एक कारण खराब रस्तादेखील आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः खराब रस्त्यांमुळे अपघात होतात, असे म्हटले आहे. 

गुजरातच्या गांधीनगरमध्ये आजोयित इंडियन रोड काँग्रेसच्या 82व्या वार्षिक अधिवेशनात बोलताना गडकरी म्हणाले की, भारतात दरवर्षी 5 लाख रस्ते अपघात होतात, ज्याचे एक कारण सदोष रोड इंजीनिअरींग आहे. 5 लाख अपघातात 1.5 लाख लोकांचा मृत्यू होतो, तर 3 लाख लोक जखमी होतात. यामुळे देशाच्या देशांतर्गत उत्पादनाला (जीडीपी) तीन टक्के तोटा होतो. मीदेखील अपघाताचा बळी ठरलो आहे, माझीही चार हाडे मोडली आहेत. 

ते पुढे म्हणाले, बळीच्या बकऱ्याप्रमाणे प्रत्येक अपघातासाठी चालकाला जबाबदार धरले जाते. पण, मी सांगू इच्छितो की, बहुतांश अपघात खराब रस्त्यामुळे आणि चुकीच्या रोड इंजीनिअरींगमुळे होतात. रस्ते तयार करताना, अपघात टाळण्यासाठी ते योग्य प्रकारे इंजिनीअर केलेले आहेत, याची काळजी घेतली पाहिजे. अपघातातील मृत्यूंपैकी 60 टक्के मृत्यू 18 ते 34 वयोगटातील आहेत. त्यापैकी बरेच जण अभियंते आणि डॉक्टर असू शकतात. तरुण पिढीचा अशाप्रकारे मृत्यू होणे देशासाठी चांगले नाही. 

रोड इंजीनिअरींग म्हणजे काय?रोड इंजीनिअरींगमध्ये रस्त्यांची रचना, गुणवत्ता आणि देखभाल, यांसारख्या गोष्टींचा समावेश होतो. चांगले रस्ते अभियांत्रिकी सुनिश्चित करते की रस्ते सुरक्षित, कार्यक्षम आणि टिकाऊ आहेत. चांगले रस्ते अपघात कमी करण्यास आणि सुरक्षा सुधारण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, चांगले रस्ते प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करण्यासही मदत करतात. यामुळे रस्ते अधिक टिकाऊ बनतात, ज्यामुळे देखभालीचा खर्च कमी होतो. 

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAccidentअपघातDeathमृत्यूAutomobileवाहन