शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
2
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
3
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
4
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
5
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
6
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
7
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
8
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
9
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
10
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
11
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
12
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
13
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
14
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
15
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
16
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
17
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
18
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
19
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध बांधली होती मशीद - शिया वक्फ बोर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2017 9:22 AM

'16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती'

ठळक मुद्दे16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होतीबाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होतीइरानच्या मौलवींनीही हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे यासाठी समर्थन दिलं आहे

नवी दिल्ली, दि. 22 - अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली असल्याचा दावा करणा-या शिया वक्फ बोर्डाने अजून एक महत्वाची माहिती दिली आहे. शिया बोर्डाने सोमवारी न्यायालयात सांगितलं की, 16 व्या शतकाच्या सुरुवातीला बाबरच्या सेनापतीने मंदिरांच्या मधोमध मशीद बांधली होती, आणि येथूनच हिंदू - मुस्लिम वादाला सुरुवात झाली. बोर्डाचे चेअरमन वसीम रिझवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'मीर बाकी हा बाबरच्या लष्कराचा सेनापती होता. तो शिया होता आणि त्याने हिंदूच्या भावनांविरोधात जात मुघल लष्कराचा वापर केला. 1528-29 दरम्यान त्याने मंदिरांच्या मधोमध मशीद उभारली. हा वादा सुरु करण्याचं काम त्यानेच केलं आहे'.   

याआधीही शिया वक्फ बोर्डाने न्यायालयात माहिती देताना सांगितलं होतं की, अयोध्येत मंदिर तोडल्यानंतर त्याठिकाणी बाबरी मशीद बांधण्यात आली आहे. बाबरी मशिदीच्या मालकी हक्काची कायदेशीर लढाई हारल्यानंतर तब्बल 71 वर्षानंतर शिया वक्फ बोर्डाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 30 मार्च 1946 रोजी ट्रायल कोर्टाने सुनावलेल्या निर्णयाला शिया वक्फ बोर्डाने आव्हान दिलं आहे, ज्यामध्ये मशिदीला सुन्नी वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याचं सांगण्यात आलं होतं. सर्वोच्च न्यायलयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत शिया वक्फ बोर्डाने सांगितलं आहे की, 'बाबरी मशीद बांधण्यासाठी त्याठिकाणी असलेलं मंदिर नष्ट करण्यात आलं होतं'. 

वसीम रिझवी यांनी सांगितलं आहे की, 'शिया वक्फ बोर्डाने सामंजस्याने हा प्रश्न सोडवण्याचा निर्णय घेतला असून, वादग्रस्त जागेपासून काही अंतरावर मुस्लिम बहुसंख्य असलेल्या परिसरात मशीद उभारली जाऊ शकते'. मशिदीला बाबर किंवा मीर बाकीचं नाव देण्यात येणार नाही असंही त्यांनी सांगितलं. त्यांनी सांगितलं की, 'सर्व वाद संपतील असं नाव मशिदीला द्दयायचं आहे. नव्या मशिदीचं नाव मस्जिद-ए-अमन असं ठेवण्यात येईल, जे शांततेचा संदेश देण्याचं काम करेल'. 

इरानच्या मौलवींनीही हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला गेला पाहिजे यासाठी समर्थन दिलं आहे. यासंबंधी कोणताही वाद होऊ नये अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. मीर बाकी याच्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये वाद होऊ फूट पडली. हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असं रिझवी बोलले आहेत. 'आज तिथे मशीद नाही आहे. पण दहशतवाद पसरवण्यासाठी परदेशातून येणारा पैसा जमा करणारे काही मुस्लिम धर्मगुरु इस्लामचं नाव खराब करत आहेत', अशी खंत रिझवी यांनी व्यक्त केली आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय