शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रजनन क्षमता दर कमी होऊनही यंदा भारताची लोकसंख्या पोहोचणार तब्बल १४६ कोटींवर
2
राशीभविष्य, ११ जून २०२५: आर्थिक लाभाची शक्यता, कामात यश मिळेल, प्रतिस्पर्ध्यांना नामोहरम कराल!
3
मुंबईत एका प्रभागात एकच नगरसेवक, नवी मुंबई, ठाणेसह अन्य महापालिकांत चार
4
मराठी माणसाने दिला २१ हजार कोटींचा टोल, पाच वर्षांत २ लाख २० हजार कोटींची टोल वसुली
5
'कुंडलीतील मंगळ दोष घालवण्यासाठी सोनमने केली पतीची हत्या', राजाच्या वडिलांचा आरोप
6
‘एसी’च्या कूलिंगवर सरकारचा कंट्रोल; लवकरच नियम येणार
7
रेडी रेकनरमध्ये आता मायक्रो झोनिंग; चाळींसह झोपडपट्ट्यांना दिलासा मिळणार : मंत्री बावनकुळे
8
आयटीआर फॉर्म चुकला, तर अडकून पडेल कर परतावा
9
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
10
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
11
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
12
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
13
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
14
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
15
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
16
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
17
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
18
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
19
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
20
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली

आता 'आयुष्यमान भारत'वरुन घमासान; आप-भाजपामध्ये पुन्हा तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 11:49 IST

केजरीवाल सरकारच्या मागणीमुळे पुन्हा संघर्ष पेटणार

नवी दिल्ली: आम आदमी पार्टी आणि भाजपा यांच्यातील संघर्षामुळे दिल्लीतील जनता 'आयुष्यमान भारत' योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्राच्या 'आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजने'वरुन आप-भाजपामध्ये वादाची नवी ठिणगी पडली आहे. 25 सप्टेंबरपासून ही योजना संपूर्ण देशात लागू करण्यात येत आहे. मात्र या योजनेच्या नावावरुन आता मोठा संघर्ष निर्माण झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यातील संघर्ष काही नवा नाही. 'आयुष्यमान भारत'वरुन या संघर्षाचा नवा अध्याय सुरू झाला आहे. आयुष्यमान भारत या योजनेच्या नावात प्रधानमंत्री जन आरोग्य असा उल्लेख आहे. मात्र दिल्लीत ही योजना लागू करताना तिचं नाव 'आयुष्यमान भारत-मुख्यमंत्री जन आरोग्य' असावं, अशी दिल्लीमधील आप सरकारची मागणी असल्याचं वृत्त मेल टुडेनं दिलं आहे. तर 'आयुष्यमान भारत' या नावानं ही योजना दिल्लीत लागू करा आणि त्यानंतर पुढील गोष्टींवर चर्चा करता येईल, अशी केंद्राची भूमिका आहे. त्यामुळे आप आणि भाजपामध्ये पुन्हा संघर्ष पेटला आहे. योजनेचं नाव हे भाजपा आणि आपमधील नव्या संघर्षामागील एकमेव कारण नाही. केंद्राच्या सर्वेक्षणानुसार दिल्लीतील 20 लाख नागरिक या योजनेचे लाभार्थी ठरतात. मात्र दिल्लीतील 50 लाख लोकांचा समावेश या योजनेत केला जावा, अशी आप सरकारची मागणी आहे. ही मागणी मान्य होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन आधीच दिल्ली आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष पेटला आहे. त्यात आता 'आयुष्यमान भारत'ची भर पडली आहे. मात्र यामुळे दिल्लीकरांचे हाल होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीayushman bharatआयुष्मान भारतArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपBJPभाजपाdelhiदिल्ली