शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

'आयुष्यमान भारत म्हणजे जनतेचा पैसा खासगी हातांमध्ये देण्याचा अधिकृत मार्ग'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 12:59 PM

एम्सच्या कार्यक्रमात डॉक्टरांचा खळबळजनक दावा

नवी दिल्ली: आयुष्यमान योजनेच्या नियोजन आणि क्षमतेवर सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी, एम्समधील डॉक्टरांची प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. आयुष्यमान भारत योजना म्हणजे जनतेला पैसा खासगी क्षेत्राला देण्याचा अधिकृत मार्ग असल्याचा सूर नवी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात उमटला. एम्समध्ये 'आयुष्यमान भारत: तथ्यं आणि कल्पना' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सरकारी रुग्णालयांमध्ये सुविधा सुधारायला हव्यात, अशी गरज यामध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी व्यक्त केली. आयुष्यमान भारत योजना म्हणजे नव्या बाटलीत जुनी दारू असल्याचं वर्णन जवाहरलाल नेहरु विद्यापीठाच्या सामाजिक आरोग्य विभागाचे प्राध्यापक डॉ. विकास बाजपेयी यांनी केलं. राष्ट्रीय आरोग्य विमा योजनेसारख्या सरकारी योजना का अपयशी ठरल्या, याचा अभ्यास करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. 'याआधीही सरकारकडून आरोग्य क्षेत्रासाठी योजना राबवण्यात आल्या. त्यातील त्रुटींचा अभ्यास केला असता, तर अधिक चांगलं झालं असतं. आधी झालेल्या चुकांची पुनरावृत्ती टाळता आली असती,' असं मत त्यांनी व्यक्त केलं.  लोकांच्या, त्यातही गरिबांच्या आजारपणाचं नेमकं कारण काय, या मुद्द्याचा आयुष्यमान भारत योजनेत विचारच करण्यात आलेला नाही, असं बाजपेयी म्हणाले. आयुष्यमान भारत योजना म्हणजे सर्वसामान्यांचा पैसा खासगी क्षेत्राच्या हाती जाणारं एक माध्यम असल्याचा दावा त्यांनी केला. एम्समधील जीवरसायनशास्त्र विभागाचे प्रमुख असलेल्या सुब्रतो सिन्हा यांनीही आयुष्यमान भारतवर प्रश्न उपस्थित केले. 'सार्वजनिक आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी मूलभूत सोयीसुविधांचा दर्जा सुधारायला हवा. कोणतीही आरोग्य योजना राबवताना हाच केंद्रबिंदू असायला हवा. मात्र आयुष्यमान योजनेत याचा विचार झालेला नाही,' असं सिन्हा म्हणाले.  

टॅग्स :ayushman bharatआयुष्मान भारतAIIMS hospitalएम्स रुग्णालय