पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असतानाच, एक्झिट पोलच्या विश्वात एक मोठी खळबळ उडाली आहे. देशातील सर्वात विश्वासार्ह मानली जाणारी निवडणूक संस्था 'ॲक्सिस माय इंडिया' ने बंगालचा एक्झिट पोल जाहीर न करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. मतदारांच्या अनाकलनीय शांततेमुळे अचूक आकडेवारी देणे अशक्य असल्याचे सांगत एजन्सीने हा मोठा निर्णय घेतला आहे.Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
'ॲक्सिस माय इंडिया'चे व्यवस्थापकीय संचालक प्रदीप गुप्ता यांनी सांगितले की, सर्व्हे दरम्यान सुमारे ६० ते ७० टक्के मतदारांनी आपली पसंती उघड करण्यास नकार दिला. "जेव्हा जनता उघडपणे बोलत नाही, तेव्हा कोणतेही आकडे देणे चुकीचे ठरेल. चुकीच्या आकड्यांमुळे संस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ शकते, त्यामुळे आम्ही डेटा रोखण्याचा निर्णय घेतला," असे गुप्ता यांनी स्पष्ट केले.
विक्रमी मतदानाचा सस्पेन्स वाढलादुसऱ्या टप्प्यात ९१.६६% आणि पहिल्या टप्प्यात ९३.१९% अशा विक्रमी मतदानामुळे आधीच सस्पेन्स वाढला आहे. दोन्ही टप्प्यांचे सरासरी मतदान ९२.४७% झाले असून, २०११ चा ८४.७२% मतदानाचा विक्रमही मोडीत निघाला आहे. विशेष म्हणजे महिला मतदारांनी (९२.८%) पुरुषांपेक्षा (९१.०७%) अधिक उत्साहाने मतदान केले आहे.
इतर एजन्सींचे काय आहेत अंदाज?प्रदीप गुप्तांनी माघार घेतली असली तरी, इतर संस्थांनी आपले अंदाज जाहीर केले आहेत, ज्यात मोठी तफावत दिसत आहे.
जनमत सर्व्हे: टीएमसी १९५-२०५ (बहुमत), भाजप ८०-९० जागा.
प्रजा पोल: भाजप १७८-२०८ (बहुमत), टीएमसी ८५-११० जागा.
NDTV पोल ऑफ पोल्स: भाजप १३७, टीएमसी १५१ (कांटे की टक्कर).
Web Summary : Axis My India declined to release West Bengal's exit poll, citing voter silence. High voter turnout adds suspense. Other agencies predict varied outcomes, showing significant differences in seat projections for TMC and BJP.
Web Summary : एक्सिस माय इंडिया ने मतदाताओं की चुप्पी का हवाला देते हुए पश्चिम बंगाल का एग्जिट पोल जारी करने से इनकार कर दिया। उच्च मतदान ने सस्पेंस बढ़ा दिया है। अन्य एजेंसियों ने अलग-अलग अनुमान लगाए हैं, टीएमसी और भाजपा के लिए सीट अनुमानों में महत्वपूर्ण अंतर दिखा रहे हैं।