शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
2
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
3
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
4
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
5
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
6
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
7
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
8
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
9
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
10
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
11
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
12
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
13
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
14
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
15
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
16
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
17
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
18
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
19
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
20
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक

राहुल गांधींचे ‘नो सावरकर’; काँग्रेसची ठाकरे गटाशी सहमती, मविआतील टेन्शन झाले कमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2023 06:34 IST

दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे. 

- आदेश रावलनवी दिल्ली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांचे नाव टाळून यापुढे इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी भर देणार असून दुसरीकडे महाराष्ट्रात भाजपने आता मिशन मी सावरकर सुरू केले आहे. शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेऊन  शिवसेनेच्या राजकारणासाठी सावरकर किती महत्त्वाचे आहेत, तसेच सद्य:स्थितीत सावरकरांचा मुद्दा सोडून आजचे मुद्दे घेऊन मोदी सरकारशी लढावे लागणार आहे, हे निदर्शनास आणून दिले.

शिवसेनेच्या या मागणीशी राहुल गांधी सहमत दिसले आणि  महाराष्ट्र आणि संसदेची लढाई एकत्र लढायची असेल तर दोन्ही पक्षांना एकमेकांच्या विचारसरणीचा आदर करावा लागेल, अशी सहमती दोन्ही पक्षांमध्ये झाली. राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मी सावरकर’ असे नवे पोस्टर आणले आणि ते आपल्या सोशल मीडियावरही ठेवले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ‘आम्ही सारे सावरकर’ असे पोस्टर सोशल मीडियावर झळकवले आहे.

संभ्रमित होऊ नका, मोदींशी लढायचे की सावरकरांशी?

‘तुम्हाला पंतप्रधान मोदींशी लढायचे आहे, की सावरकरांशी ते ठरवा, आणि संभ्रमित होऊ नका,’ असा सबुरीचा सल्ला देत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या मनात खदखदत असलेला सावरकर विरोध शमविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. राहुल गांधींनी सावरकरांना लक्ष्य करण्याचे टाळावे, असे आवाहन शरद पवार तसेच डाव्या आघाडीच्या नेत्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी सोमवारी आयोजित केलेल्या विरोधी पक्षनेत्यांच्या रात्रीभोजमध्ये केले. या भोजनावर ठाकरे गटाच्या खासदारांनी बहिष्कार टाकला होता. सावरकरांवर टीका करणे बरोबर नाही. हा प्रत्येकाच्या विचारधारेचा विषय आहे. त्यातून काही साध्य होणार नाही, असा सल्ला माकपचे विनय विश्वम आणि अन्य नेत्यांनी दिला. 

लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्यावर अविश्वास?

विरोधी पक्षांशी झालेल्या बैठकीत अनेक प्रकारचे प्रस्ताव दिले जातात. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला पाहिजे, असा प्रस्ताव काँग्रेसचे लोकसभा सदस्य मनीष तिवारी यांनी दिला आहे. हा प्रस्ताव ठेवला तेव्हा केवळ काँग्रेसचे सदस्य उपस्थित होते. त्यामुळे आतापर्यंत या विषयावर विरोधी पक्षांशी कोणतीही चर्चा झाली नाही. बुधवारी सकाळी विरोधकांच्या बैठकीत यावर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ठाकरे आमच्यासोबत : जयराम रमेश 

ठाकरे गटाचे राज्यसभेतील नेते संजय राऊत यांनीही राहुल गांधी यांची भेट घेऊन सावरकरांच्या मुद्द्यावर चर्चा केली. प्रत्येक पक्षाची आपली स्वतंत्र विचारधारा आहे. आम्ही सावरकरांना मानतो आणि मानणार. सावरकरांवरील टीकेचा महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील सर्वच पक्षांना त्रास होईल याची जाणीव राऊत यांनी करून दिली. त्यावर सहमत होत राहुल गांधी यांनी पुढे टीका न करण्याचे आश्वासन दिले. हा विषय आता संपलेला आहे, असे राऊत म्हणाले.

काँग्रेस अध्यक्षांच्या बैठकीला १८ विरोधी पक्षांनी हजेरी लावली होती. मात्र, काँग्रेसचे प्रसार माध्यम प्रभारी जयराम रमेश आणि सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, आता १९ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत, जे गौतम अदानींच्या मुद्द्यावर संसदेपासून रस्त्यापर्यंत लढणार आहेत. शिवसेनेचा ठाकरे गट आमच्यासोबत आहे. जी काही छोटी समस्या होती, त्यावर उपाय सापडला आहे.

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसBJPभाजपा