शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

गळतीचा शोध घेण्यासाठी पाण्याचे होणार ऑडिट

By admin | Updated: August 2, 2015 22:55 IST

नवी मंुबई : शहराला होणार्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या गळतीचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाण्याचे ऑडिट करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला आहे. तशा आशयाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

नवी मंुबई : शहराला होणार्‍या एकूण पाणीपुरवठ्यापैकी १९ टक्के पाण्याची गळती होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाण्याच्या गळतीचा शोध घेवून त्यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने पाण्याचे ऑडिट करण्याचा निर्णय महापौर सुधाकर सोनवणे यांनी घेतला आहे. तशा आशयाचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने शहरातील अनधिकृत नळजोडण्या खंडित करण्याची मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत अनेक नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर ऐरोलीचे आमदार संदीप नाईक यांनी महापौर सुधाकर सोनवणे व महापालिका आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेवून चर्चा केली. अनधिकृत नळ जोडण्यांवर कारवाई झालीच पाहिजे. मात्र त्यात पारदर्शकता आणावी. लोकांना त्याचा त्रास होणार नाही, या दृष्टीने कारवाईचे स्वरूप आखावे, अशी सूचना आमदार नाईक यांनी आयुक्तांकडे केली. अनधिकृत नळजोडण्यांवर कारवाई करताना संबंधितांना अगोदर नोटीस द्या. त्यामुळे त्यांना पर्यायी व्यवस्था करता येईल, असेही त्यांनी सूचित केले आहे. दरम्यान, आमदार नाईक यांच्या मागणीची दखल घेत महापौर सोनवणे यांनी तशा आशयाचे निर्देश संबंधित विभागाला दिले आहेत. नवीन नळजोडणी घेताना नागरिकांना काही बाबी गैरसोयीच्या ठरत असतील तर त्यात सुधारणा करा, अशा सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. तसेच मागेल त्याला पाणी या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी सर्वप्रथम पाण्याचे ऑडिट होणे गरजेचे आहे. त्यामुळे पुढील महिनाभरात त्या दृष्टीनेही कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला दिल्याची माहिती महापौर सोनवणे यांनी लोकमतला दिली. (प्रतिनिधी)