शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

अतुल सुभाषच्या आईला नाही मिळाला नातवाचा ताबा, निकिताकडेच राहणार मुलगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 18:28 IST

काही दिवसांपूर्वी आत्महत्या केलेल्या अतुल सुभाषच्या मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्याच्या आईने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

Supreme Court News: आत्महत्या केलेल्या इंजिनिअर अतुल सुभाषच्या आईला सर्वोच्च न्यायालयात झटका बसला. अतुल सुभाषच्या मुलाचा ताबा मिळावा म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण, कोर्टाने मुलगा त्याच्या आईकडेच राहील असे स्पष्ट केले. कोर्टाने अतुल सुभाषच्या आईला यासंदर्भात कनिष्ठ न्यायालयात जाण्यास मूभा दिली आहे.

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा! 

अतुल सुभाषची आई अंजू देवा यांनी ४ वर्षाच्या नातवाचा (अतुल सुभाषचा मुलगा) ताबा मागितला होता. याचिकेत अतुल सुभाषच्या आईने म्हटले की, निकिता आणि तिच्या कुटुंबाने अतुलला खोट्या गुन्ह्यात अडकवलं. पैसे मागून त्रास दिला. त्यामुळे त्याला आत्महत्या करावी लागली. निकिता सिंघानियाकडे अतुलचा मुलगा सुरक्षित नाहीये. 

न्यायमूर्ती नागरत्ना आणि न्यायमूर्ती साईश चंद्र शर्मा यांच्या खंठपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. 

न्यायालयाने मागणी का फेटाळली?

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, "आम्हाला हे सांगता खेद वाटतोय, पण मुलासाठी याचिकाकर्ती (अतुलची आई) अनोळखी आहे. जर तुमची इच्छा असेल, तर तुम्ही मुलाला भेटू शकता. जर तुम्हाला मुलाचा ताबा हवा असेल, तर यासाठी वेगळी प्रक्रिया आहे", असे सांगत न्यायालयाने मागणी फेटाळून लावली. 

अतुल सुभाषची पत्नी निकिता सिंघानियाच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, मुलगा हरयाणातील एका निवासी शाळेत शिकत आहे. 

गेल्या वर्षी म्हणजे ९ डिसेंबर रोजी ३४ वर्षीय अतुल सुभाष याचा बंगळुरूतील मुन्नेकोलालू येथे राहत्या घरात मृतदेह आढळला होता. गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह होता. आत्महत्या करण्यापूर्वी अतुल सुभाषने तासभराचा व्हिडीओ रेकॉर्ड केलेला होता. त्यात त्याने पत्नी आणि सासरच्या लोकांनी आत्महत्या करण्यास भाग पाडल्याचा आरोप केलेला आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयBiharबिहारBengaluruबेंगळूरCrime Newsगुन्हेगारी