शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

प. बंगाल व उत्तर भारतावर सर्वच नेत्यांचे लक्ष; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मताधिक्य वाढविण्याची तयारी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 4:32 AM

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी ...

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात १९ मे रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, त्यात पंतप्रधान मोदी यांचा वाराणसी मतदारसंघही आहे. उत्तर भारतात उष्णतेची लाट असून, आतापर्यंत बिहार व उत्तर प्रदेशात ५0 टक्क्यांपर्यंत मतदान झाले. शेवटच्या टप्प्यात अधिक मतदान व्हावे व पंतप्रधान मोदी यांचे मताधिक्य गेल्या वेळपेक्षा अधिक असावे, असा भाजपचा प्रयत्न आहे.

या टप्प्यासाठी पंतप्रधान मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, व भाजपचे नेते अधिक सक्रिय झाले आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, सपाचे प्रमुख अखिलेश यादव, बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सभांचा धडाका लावला आहे. सॅम पित्रोडा यांच्या शीखविरोधी दंगलींबाबत विधानाचा पंजाबमध्ये फटका बसू नये, यासाठी काँग्रेस प्रयत्न करीत आहे. त्याचमुळे राहुल गांधी यांनी सोमवारीही पित्रोडा यांच्या विधानाचा जाहीरपणे निषेध केला.

काँग्रेसची सत्ता असलेल्या राजस्थानातील दलित महिलेवरील बलात्काराचे प्रकरण हा पंतप्रधान मोदींनी प्रचाराचा मुद्दा बनविला आहे. या प्रश्नावरून मायावती यांनी गेहलोत सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा, असे मोदी म्हणत आहेत. उत्तर प्रदेशात मायावती व अखिलेश यांच्या आघाडीचा सामना करणे शक्य नसल्याचे भाजपच्या लक्षात आल्याने तिथे त्या पक्षांवरच मोदी हल्ला चढवत आहेत. पश्चिम बंगालमध्ये मोदी व अमित शहा आणखी सभा घेणार असून, त्यामुळे तिथे भाजप व तृणमूल यांच्यातील कटुता वाढेल, असे दिसते.

या राज्यांमध्ये १९ मे रोजी मतदानया टप्प्यात उत्तर प्रदेश (१३ जागा), बिहार (८), पश्चिम बंगाल (९), मध्य प्रदेश (८), झारखंड (३), पंजाब (१३) हिमाचल प्रदेश (४) व चंदीगड (१) येथे आहे. पंजाब व हिमाचल प्रदेशातील सर्व जागांवर त्या दिवशी एकाच टप्प्यात मतदान होत आहे. बिहारमध्ये लढाई भाजप व राष्ट्रीय जनता दल यांच्यातच दिसत आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRahul Gandhiराहुल गांधीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019