शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

पुलवामासारखे हल्ले होतच असतात, त्यासाठी पाकिस्तानवर स्ट्राइक करणं चुकीचं; पित्रोडांना पाकिस्तानचा पुळका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 10:44 IST

पित्रोडांच्या विधानामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता

नवी दिल्ली: काही जण येऊन हल्ले करतात, त्यासाठी संपूर्ण देशाला दोषी धरणार का?, असा प्रश्न उपस्थित करत काँग्रेस नेते सॅम पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे पाकिस्तानसाठी जोरदार बॅटिंग केली आहे. पुलवामा हल्ल्यावर भाष्य करताना पित्रोडांनी हा सवाल उपस्थित केला. यामुळे मोठा वादंग निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईवर 26/11चा हल्ला झाला. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकत होतो. मात्र असं करणं योग्य नाही. तुम्ही अशाप्रकारे वागू शकत नाही, अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी अप्रत्यक्षपणे एअर स्ट्राइकवर भाष्य केलं.

पुलवामा हल्ला आणि त्यानंतर भारतीय हवाई दलानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये केलेला एअर स्ट्राइक यावर सॅम पित्रोडांनी भाष्य केलं. 'मला हल्ल्यांविषयी फारसं माहीत नाही. पण असे हल्ले होतच असतात. मुंबईवरदेखील हल्ला झाला होता. त्यावेळी आम्हीदेखील विमानं पाठवू शकलो असतो. मात्र ते योग्य नाही. तुम्ही असं वागू शकत नाही, असं मला वाटतं,' अशा शब्दांमध्ये पित्रोडांनी पुलवामा हल्ला आणि हवाई दलाच्या हल्ल्यावर भाष्य केलं. काँग्रेसचे परदेश प्रमुख असलेले पित्रोडा राहुल गांधींचे निकटवर्तीय मानले जातात.

पुलवामा हल्ल्याबद्दल बोलताना त्यांनी 26/11 हल्ल्यावरही भाष्य केलं. 'आठजण आले आणि त्यांनी काहीतरी केलं. त्यासाठी तुम्ही देशाला (पाकिस्तानला) जबाबदार धरू शकत नाही. त्या देशातले काहीजण येऊन हल्ला करतात, त्यासाठी त्यांच्या देशातील प्रत्येक नागरिकाला दोषी धरता येणार नाही. यावर माझा विश्वास नाही,' असं पित्रोडा म्हणाले. हवाई दलाच्या हल्ल्यात किती दहशतवादी मारले गेले, याची माहिती सरकारनं द्यायला हवी, असं पित्रोडा म्हणाले. 'आपण नेमका कुठे हल्ला केला, हे समजायला हवं. आपण खरंच 300 जणांचा खात्मा केला का?,' असा सवाल त्यांनी विचारला. 'तुम्ही 300 जण मारले असतील, तर आपल्याला ते कळायला हवं. सर्व भारतीयांना याची माहिती द्यायला हवी. हवाई दलाच्या हल्ल्याच कोणीच मारलं गेलं नाही, असा दावा आंतरराष्ट्रीय माध्यमं करतात. त्याबद्दल एक भारतीय म्हणून मला वाईट वाटतं,' असंदेखील ते पुढे म्हणाले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाRahul Gandhiराहुल गांधीIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकPakistanपाकिस्तानcongressकाँग्रेसindian air forceभारतीय हवाई दलterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला