शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
2
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
3
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
4
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
5
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
6
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
7
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
8
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
9
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
10
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
11
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
12
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
13
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
14
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
15
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
16
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
17
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
18
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
19
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
20
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा

'आयडिया ऑफ इंडिया' म्हणत सावरकरांवर हल्लाबोल, राहुल गांधींच्या भाषणात कन्हैय्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 3:47 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला.

ठळक मुद्देजर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत.

नवी दिल्ली - काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर कन्हैय्या कुमार आणि गुजरातमधील आमदार जिग्नेश मेवानी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी, कन्हैय्या कुमारने भाषण करताना भाजपवर हल्लाबोल केला. तसेच, देशातील सर्वात जुना पक्ष असल्याने आणि महात्मा गांधींच्या विचारांचा वारसा असल्याने आपण काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे कन्हैय्याने म्हटले होते. तसेच, भारतीय संविधान आणि आयडिया ऑफ इंडियाचाही त्यांनी अनेकदा उल्लेख केला. राहुल गांधींच्य केरळमधील भाषणातही आज तोच सूर पाहायला मिळाला.  

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी बुधवारी केरळ दौऱ्यावर पोहोचले आहेत. येथील कोझिकोड विमानतळावर काँग्रेसच्यावतीने त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. त्यानंतर, मलप्पुरम येथे जाऊन हिमा डायलेसिस सेंटरच्या उद्घाटन समारंभात त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधीं भारत म्हणजे नेमकं काय हे सांगितलं. यावेळी, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा उल्लेख करत भाजपला लक्ष्य केलं. 

जर तुम्ही सावरकर यांच्यासारख्या लोकांचा इतिहास वाचाल, तर तुम्हाला भारत हा केवळ भुगोल दिसेल. कारण, ते पेन घेतात, नकाशा काढतात आणि सांगतात हा आहे भारत. या रेषेच्या बाहेर जे आहे ते भारत नाही अन् या रेषेच्या आतमध्ये जो दिसतोय तो आहे भारत, असे ते सांगतील, असे राहुल गांधींनी म्हटले.  .

ते म्हणतील भारत हा प्रदेश आहे, पण भारत हा विविध लोकांचं नातं आहे. हिंदू-मुस्लीमांचं नात आहे, हिंदू-मुस्ली-शीख धर्मीयांचा आहे. हिंदी-तमिळ, तेलुगू, उर्दू, बंगाली या सर्वांचं नातं आहे. आपल्यातलं हेच नातं फोडण्याचं काम पंतप्रधान करत आहेत, ही मला समस्या वाटते, असे म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच, ते भारताच्या सार्वभौमत्वावरच हल्ला करत आहेत. मात्र, लोकांमध्ये नात्यांचा हा पुल बांधणं ही माझी जबाबदारी आहे, म्हणून मी त्यांना विरोध करतो, असेही राहुल गांधींनी म्हटले. 

काय म्हणाले होते कन्हैय्या कुमार 

कन्हैया म्हणाला, मी स्पष्टपणे सांगतो, की पंतप्रधान आजही आहेत, कालही होते आणि भविष्यातही होतील. पण, आज आम्ही राहुल गांधींच्या उपस्थितीत फॉर्म भरत होतो, तेव्हा सहकारी जिग्नेशने एक संविधानाची प्रत आणि मी गांधी-आंबेडकर आणि भगतसिंग यांचा फोटो त्यांना भेट दिला. कारण, या देशाला आज भगतसिंगांची साथ, आंबेडकरांची समानता आणि महात्मा गांधींच्या एकतेची आवश्यकता आहे. जो सर्वात मोठा विरोधी पक्ष आहे, तो वाचवता आला नाही, तर देशही वाचणार नाही. जर मोठे जहाज वाचले नाही, तर लहान बोटीही वाचणार नाहीत. मी जिथे जन्मलो, ज्या पक्षात मोठा झालो, त्याने मला शिकवले, लढण्याची हिम्मत दिली. मी त्या पक्षा सोबतच, अशा लाखो आणि कोट्यवधी लोकांचेही आभार मानतो, जे कुठल्याही पक्षाचे नव्हते, पण कुण्या पक्षाकडून आमच्यावर अनावश्यक आरोप झाल्यानंतर, ते आमच्यासाठी व्हॉट्सअॅपवर लढत होते. या देशाला केवळ काँग्रेसच नेतृत्व देऊ शकते. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkanhaiya kumarकन्हैय्या कुमारKeralaकेरळ