शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

पुलवामाचा बदला घेत बालाकोटमध्ये केला हल्ला; विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 1:07 AM

दोन वर्षे पूर्ण : विंग कमांडर अभिनंदन यांच्या पराक्रमाला सलाम

नवी दिल्ली : काश्मिरात पुलवामामध्ये फेब्रुवारी २०१९ मध्ये झालेल्या अतिरेकी हल्ल्यामुळे देशात संतापाची लाट होती. या हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते. पाकिस्तानातील बालाकोटमध्ये भारताने हल्ला करून याचा बदला घेतला. त्याला आज दोन वर्षे पूर्ण झाली. 

पाकिस्तानातील जैश-ए-मोहम्मदच्या प्रशिक्षण ठिकाणावर भारताने हल्ला केला होता. भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्या अतिरेक्यांना याच ठिकाणी मारण्यात आले होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय हवाई दलाचे कौतुक करत स्पष्ट केले होते की, हा हवाई हल्ला म्हणजे भारतावर हल्ला करण्याची हिंमत करणाऱ्यांना इशारा आहे. 

१४ फेब्रुवारी २०१९ रोजी जैशच्या अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यात स्फोटकांनी भरलेले वाहन घुसविले होते. पुलवामातील या घटनेत ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी भारतीय हवाई दलाने एलओसीवरून पाकिस्तानच्या बाजूने हवाई हल्ले केले. या हल्ल्यात ३५० हून अधिक अतिरेकी मारले गेल्याचे सांगण्यात येते. मृतात जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा मेहुणा युसूफ अझहर हाही होता. 

भारतीय हवाई दलाचे जोरदार प्रत्युत्तर

या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानने भारतीय हद्दीत जेट पाठविले. त्याला भारतीय हवाई दलाने प्रत्युत्तर दिले आणि हे विमाने परतवून लावले. या घटनाक्रमात विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे जेट पीओकेमध्ये दुर्घटनाग्रस्त झाले. अभिनंदन यांना पाकिस्तानने ताब्यात घेतले. ६० तासांनंतर अभिनंदन यांची पाकिस्तानने सुटका केली. २८ फेब्रुवारी रोजी अभिनंदन यांची सुटका झाली. अभिनंदन यांना ऑगस्ट २०१९ मध्ये वीरचक्राने सन्मानित करण्यात आले. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाIndiaभारत