शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

एटीएममधून पैसे चोरल्याचा तक्रारींंसाठीही लागताहेत रांगा....

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2018 12:30 PM

पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागतात हे पाहिले असेलच, पण एटीएममद्वारे पैसे चोरल्याच्या तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्येही रांगा लागत आहेत. होय, सध्या नवी दिल्लीकर या फसवणुकीमुळे भलतेच त्रस्त झाले आहेत.

नवी दिल्ली : पैसे काढण्यासाठी एटीएमबाहेर रांगा लावाव्या लागतात हे पाहिले असेलच, पण एटीएममद्वारे पैसे चोरल्याच्या तक्रारी करण्यासाठी पोलिस ठाण्यांमध्येही रांगा लागत आहेत. होय, सध्या नवी दिल्लीकर या फसवणुकीमुळे भलतेच त्रस्त झाले आहेत. रविवारी दिल्लीतील शकरपूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदविण्यासाठी चक्क रांग लावावी लागली आहे. 

नवी दिल्लीमध्ये या महिन्याभरामध्ये एटीएमचा वापर करून ठगांनी पैसे काढल्याची प्रकरणे मोठ्या प्रमाणावर घडली आहेत. या फसवणुकीची तक्रार दाखल करण्यासाठी नागिरकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यांमध्ये धाव घेतली आहे. काही पोलीस ठाण्यांनी तक्रार नोंदविण्यास नकार दिला असून नागरिकांना दुसऱ्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्याचा सल्लाही दिला आहे, असा आरोप नागरिकांनी केला आहे. 

एका विद्यार्थ्याच्या खात्यातून रविवारी सकाळी 5 हजार रुपये काढण्यात आले. हे पैसे दुसऱ्या भागातील देना बँकेच्या एटीएममधून काढण्यात आले. तो नजीकच्या शकरपूर पोलीस ठाण्यात पोहोचला तर त्याला मंडावली पोलिसांत जाण्य़ास सांगण्यात आले. तेथील पोलीस ठाण्यातूनही त्या विद्यार्थ्याला तक्रार न घेता माघारी पाठविण्यात आले. तसेच एका महिलेच्या खात्यातून 50-50 हजार असे दोनवेळा पैसे काढण्यात आले आहेत. तिने तक्रार नोंदवूनही तिला तिचे पैसे परत मिळालेले नाहीत. 

केंद्रातील मोदी सरकार जरी डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देण्य़ाचा प्रयत्न करत असले तरी लोकांचे पैसे त्यांच्या बँक खात्यातून गायब होत आहेत. यामुळे खरेच डिजिटल अर्थव्यवस्था सुरक्षित आहे का, हा प्रश्न निर्माण होत आहे.  

टॅग्स :atmएटीएमbankबँकfraudधोकेबाजीPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणेNew Delhiनवी दिल्ली