शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

१८ वर्ष लागली, नववधूचा शाप खरा ठरला! विवाहाच्या नवव्या दिवशी अतिकने केला होता पतीचा मर्डर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 11:17 IST

Atiq Ahmed: नेमकं प्रकरण काय होतं? कधी घडली होती घटना? जाणून घ्या...

Atiq Ahmed: प्रयागराजमध्ये माफिया, राजकारणी अतिक अहमद याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दोन आठवड्यांपूर्वी उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या कोठडीत असताना त्याची संरक्षण देण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती. अतिक आणि त्याचा भाऊ अशरफ यांनी गेल्या ४० वर्षांपासून असलेली दहशत संपुष्टात आल्याचे बोलले जात आहे. यातच आता एका नववधूने दिलेला शाप तब्बल १८ वर्षांनंतर खरा ठरल्याचे म्हटले जात आहे. या महिलेच्या पतीची विवाहाच्या नवव्या दिवशी अतीक अहमदने हत्या केली होती. 

अतिक आणि अशरफ यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. काहीच दिवसांपूर्वी अतिकचा मुलगा अदसचा एन्काऊंटरमध्ये खात्मा करण्यात आला होता. तीन दिवसातच अतिकचे कुटुंबच नेस्तनाबूत झाले. या निमित्ताने १८ वर्षांपूर्वीच्या घटनेचा वारंवार उल्लेख होत आहे. अतिकच्या परिवाराला एका महिलेने शाप दिला होता. माझ्या पतीला ज्याप्रमाणे घेरून गोळीबारात ठार करण्यात आले. तसाच मृत्यू एक दिवस तुझ्याही वाट्याला येईल, या शब्दांत संताप व्यक्त केला होता. अतिकच्या हत्येनंतर या महिलेचा शाप खरा ठरल्याचे म्हटले जात आहे.

राजू पाल यांच्या पत्नीने दिला होता शाप

ही घटना सन २००५ मधील असल्याचे सांगितले जात आहे. प्रयागराज पश्चिम विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक होती. अतिकने त्याचा भाऊ अशरफला निवडणुकीत उतरवले होते. अशरफसमोर बसपाचे राजू पाल निवडणुकीच्या रिंगणात होते. राजू पाल यांनी ही विधानसभेची पोटनिवडणूक जिंकली. त्यानंतर काहीच दिवसांत राजू पाल यांचा विवाह झाला. पराभूत झालेल्या अतिक अहमद आणि अशरफ यांना राजू पाल यांचा विजय सहन झाला नाही. त्यांनी राजू पालची हत्या करण्याचा प्लॅन आखला. २५ जानेवारी २००५ रोजी धूमनगंज या ठिकाणी राजू पालला गुंडांनी घेरले आणि तिथेच त्याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. या भीषण हत्याकांडाने प्रयागराज हादरले. राजू पाल यांच्या पत्नी पूजा पाल यांच्या हातावरची मेहंदी गेली नव्हती. विवाहाच्या नवव्या दिवशीच तिच्या पतीची खुलेआम हत्या करण्यात आली. त्याच दिवशी पूजा पालने अतिक आणि त्याच्या कुटुंबाला शाप दिला होता. 

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल

अतिक आणि त्याच्या गुंडांनाही एक दिवस असेच मरण येईल, जसे माझ्या पतीला आले. एक ना एक दिवस देव त्यांच्या कर्माचे फळ त्यांना देईल, असा संताप पूजा पाल यांनी व्यक्त केला होता. १८ वर्षानंतर शनिवारी रात्री घडलेल्या घटनेनंतर राजू पाल हत्याकांडावर अधिक चर्चा होत असल्याचे सांगितले जात आहे. अतिक आणि अशरफ यांच्या मृत्यूनंतर पूजा पाल यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. जैसा करता है वैसाही भरता है. इतिहासाची पुनरावृत्ती होतच असते. माणसाच्या कर्माचे फळ इथेच भोगून जावे लागते, असे त्या म्हणाल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेश