शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

'त्यांच्या शोकसभेमध्ये बोलण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2018 18:10 IST

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींना वाहिली श्रद्धांजली...वाचा कोण काय म्हणाले...

नवी दिल्ली : अटल बिहारी वायपेयींनी देशवासियांच्या आकांक्षांना पूर्ण केले. त्यांनी भारताला प्रत्येक क्षेत्रात पुढे नेले. विदेश नितीसाठी जे आवश्यक होते ते सर्व केले. अणुबॉम्बची चाचणी ते काश्मीरपर्यंत वाजपेयींनी दिलेल्या दृष्टीमुळे भारताची जगभरात एक वेगळी प्रतिमा निर्माण झाली. त्यांच्यामुळे काश्मीरकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आणि जगभरात दहशतवादाची चर्चा होऊ लागल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ते अटलबिहारी वाजपेयींना श्रद्धांजली देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात बोलत होते. 

दिल्ली येथील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, आरएसएसचे मोहन भागवत, योगगुरु रामदेव बाबा यांच्यासह इतर पक्षांचे नेते उपस्थित होते. यावेळी मोदी म्हणाले, की वाजपेयी यांनी लहानपणापासून ते त्यांचे शरीर जोपर्यंत साथ देते होते तोपर्यंत देशाची सेवा केली. देशाचा तेव्हाचा राजकीय कालखंड बदनामीने भरलेला असतानाही त्यांनी वेगळी विचारधारा ठेवून प्रवास केला. शून्यातून विश्व कसे निर्माण केले जाते, हे वाजपेयींच्या कामातून दिसते. 

अटलबिहारी वाजपेयींसोबत एवढ्या सभा केल्या, परंतू त्यांना श्रद्धांजली देण्याच्या सभेमध्ये आपण बोलण्याचा कधीही विचार केला नव्हता. मी एक पुस्तक लिहिले होते. मात्र, या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी वाजपेयी नसल्याचे मला दु:ख झाल्याचे, एकेकाळी वाजपेयींसोबत काम केलेले भाजपचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी सांगत वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली.वाजपेयींना जेवण बनविण्याचा छंद होता. ते खूप स्वादिष्ट जेवण बनवायाचे. वाजपेयींकडून आपण खूप काही शिकलो. त्यांच्या अनुपस्थितीत बोलायला लागतेय याचे दु:ख होते, असे शेवटी अडवाणी म्हणाले.

यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनीही वाजपेयींना श्रद्धांजली वाहिली. सार्वजनिक आयुष्यात एवढे मोठे यश संपादन केल्यानंतरही वाजपेयी सर्वसामान्यांच्या बाबतीत संवेदनशील होते. त्यांच्यातील कवी त्यांनी शेवटपर्यंत जिवंत ठेवला होता, असेही भागवत यांनी सांगितले.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदीLal Krishna Advaniलालकृष्ण अडवाणी