शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालानंतर उद्धव ठाकरे पुन्हा भाजपासोबत जातील?; शरद पवारांचं मोठं विधान
2
बुद्धिबळपटू तनिषा बोरामणिकरने बारावीत मिळवले १०० टक्के; पुढचे टार्गेट CA, त्यानंतर UPSC
3
फडणवीस अचानक पुण्याच्या पोलीस आयुक्तालयात धडकले; अपघात प्रकरणी कारवाईचा धडाका?
4
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
5
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
6
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
7
पुणे अपघात: आमदाराने पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोप, ३ दिवसांनंतर अजित पवार ॲक्शन मोडवर!
8
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
9
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
10
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
11
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
12
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
13
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध
14
Gold Price Today : सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! सोन्याचे दर पुन्हा घसरले
15
महेंद्रसिंग धोनी आम्हाला कळवेल...! कॅप्टन कूलच्या निवृत्तीच्या चर्चांवर CSK ने दिले महत्त्वाचे अपडेट्स
16
PM मोदींच्या वक्तव्यानंतर सरकारी कंपन्यांच्या शेअरमध्ये तेजी, कोल इंडियाबाबत ब्रोकरेज बुलिश, म्हणाले...
17
T20 WC 2024: "रिंकू एकमेव खेळाडू आहे जो...", 'भज्जी'ने टीम इंडियासाठी सांगितली रणनीती
18
Closing Bell: शेअर बाजाराचं मार्केट कॅप $५ ट्रिलियन पार; मेटल शेअर्समध्ये तेजी, बँक-आयटी घसरले
19
एका सेक्स वर्करमुळं २११ ग्राहकांची झोप उडाली; पोलीस करतायेत प्रत्येकाला कॉल
20
हिंदी सोडा 'या' साऊथ अभिनेत्याकडे आहे कोट्यवधींची संपत्ती, बुर्ज खलिफामध्ये फ्लॅट अन्...

Atal Bihari Vajpayee: जेव्हा संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत वाजपेयी हिंदीमध्ये बोलले...

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 12:43 PM

1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते. सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळाली.

मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत हिंदीतून भाषण करत एक नवा इतिहास रचला होता. 1977 साली भारतातील आणीबाणी संपल्यावर मोरारजी देसाई यांच्या नेतृत्त्वाखाली नवे सरकार सत्तेवर आले. या सरकारमध्ये अटलबिहारी वाजपेयी परराष्ट्र खात्याची जबाबदारी सांभाळत होते.

सरकार स्थापन झाल्यावर सहा महिन्यांच्या कालावधीतच त्यांना संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत बोलण्याची संधी मिळाली.त्यांच्यापूर्वी भारतीय किंवा जगभरातील कोणत्याही नेत्याने संयुक्त राष्ट्रात हिंदीतून भाषण केले नव्हते. मात्र वाजपेयी यांनी हिंदीतून भाषण करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यांच्यानंतर अनेक भारतीय नेत्यांनी हिंदीतून भाषण केले मात्र वाजपेयी यांनी या चांगल्या प्रथेची सुरुवात केली होती.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास

या भाषणामध्ये वाजपेयी यांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेला शुभेच्छा देऊन सर्वांना संबोधित करायला सुरुवात केली होती. आमचे नवे सरकार सत्तेत येऊन केवळ सहाच महिने झाले आहेत मात्र आम्ही इतक्या कमीवेळात गतीमान पावले उचलून मूलभूत मानवाधिकार प्रस्थापित केले आहेत. देशातील भीती आणि दहशतीचे वातावरण आता संपले आहे असे त्यांनी सांगितले. घटनात्मक मार्गांचा वापर करुन लोकशाही आणि मूलभूत स्वातंत्र्याची पुनर्स्थापना करण्यात आल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला होता.

वसुधैव कुटुंबकम ही आमच्या देशातील लोकांची अत्यंत प्राचीन धारणा आहे. हे सर्व विश्व एक असून आपण त्याचे नागरीक आहोत यावर आमचा विश्वास आहे. सामान्य नागरिकाची प्रतिष्ठा आणि प्रगती याच्याशिवाय माझ्यासाठी दुसरे काहीही महत्त्वाचे नाही. संपूर्ण मानव समाजाला आपण न्याय देऊ शकतो का याकडे लक्ष देण्याची गरजही वाजपेयी यांनी व्यक्त केली होती. यावेळेस वाजपेयी यांनी आफ्रिकेतील अस्थैर्य आणि पश्चिम आशियातील नव्या संकटांची नांदी याकडे सर्वांचे लक्ष वेधले होते.

हेमा मालिनीचे चाहते होते वाजपेयीवेस्ट बँक आणि गाझामध्ये इस्रायल उभ्या करत असलेल्या नव्या वसाहतींमुळे प्रश्न निर्माण होतील व भविष्यात ते घातक ठरेल अशी भीती त्यांनी व्यक्त केली होती. जीनिव्हा येथे परिषद बोलवून पीएलओला प्रतिनिधित्व देण्याची गरजही त्यांनी बोलून दाखवली. भाषणाचा शेवट 'जय हिंद' असा करण्याऐवजी 'जय जगत' असा करुन भारतीयांच्या सर्वसमावेशक भूमिकेचा पुन्हा एकदा सन्मान केला होता.

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी