शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

Atal Bihari Vajpayee : अविश्रांत देशसेवा करीत राहू, १३ दिवसांचे सरकार कोसळले त्यावेळी वाजपेयींनी केलेले भाषण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:11 AM

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली.

अटलबिहारी वाजपेयी यांनी १९९६ मध्ये पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तथापि, त्यांचे हे सरकार फक्त १३ दिवस टिकले. विश्वासदर्शक ठरावास सामोरे न जाताच वाजपेयी यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याची घोषणा केली. यावेळी त्यांनी लोकसभेत केलेले भाषण अत्यंत ओजस्वी होते. ‘मी मृत्यूला नव्हे, तर जननिंदेला घाबरतो,’ असे ते या भाषणात म्हणाले होते.या भाषणातील वाजपेयी यांच्या भाषणाचा काही अंश :आम्ही ज्या जागा जिंकलेल्या आहेत, त्या काही नशिबामुळे जिंकलेल्या नाहीत. आम्ही लोकांमध्ये गेलो. आमचा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी आम्ही कठोर मेहनत घेतली. त्यामुळे या जागा आम्हाला मिळाल्या आहेत आणि आज अचानक आम्हाला केवळ आणखी काही जागा मिळाल्या नाहीत, म्हणून टोमणे मारले जात आहे. ठीक आहे, ही आमची थोडीशी कमजोरी राहून गेली, हे मी मान्य करतो.राष्ट्रपतींनी आम्हाला (सरकार स्थापन्याची) संधी दिली. आम्ही ती संधी स्वीकारली. आम्ही यशस्वी झालो नाही; पण तो मुद्दा वेगळा आहे; परंतु आम्ही सर्वांत मोठा विरोधी पक्ष म्हणून येथे बसलेले असू आणि हे सभागृह चालविण्यासाठी तुम्हाला आमची मदत घ्यावीच लागेल. हे कधीही विसरू नका आणि मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, हे सभागृह चालविण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू. मी तुम्हाला आश्वस्त करतो की, तुम्हाला सत्ता हवी आहे, तर तुम्ही सत्ता घ्या. आम्ही या देशासाठी काम करू इच्छितो आणि त्यासाठी आम्ही कधीच स्वस्थ बसणार नाही.तुम्ही हा देश चालवू इच्छिता. चांगली गोष्ट आहे. आमच्या शुभेच्छा, अभिनंदन तुमच्यासोबत आहे. आम्ही देशाच्या सेवेत आम्हाला पूर्णपणे झोकून देऊ. आम्ही बहुमतासमोर नतमस्तक आहोत. आम्ही देशसेवेचे जे व्रत घेतले आहे, ते पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. आम्ही विश्रांती घेणार नाही. आदरणीय अध्यक्ष महोदय, मी माझा राजीनामा देण्यासाठी राष्ट्रपतींकडे जात आहे.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीlok sabhaलोकसभा