शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Atal Bihari Vajpayee: सावरकरांच्या कवितेचा अनुवाद करण्याचा प्रयत्न वाजपेयींनी केला होता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:31 IST

आपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते.

मुंबई- माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे उत्तम पत्रकार, नेते आणि कवी होते. कवीहृदयाचे पंतप्रधान म्हणून त्यांची विशेष ओळख होती. अटलबिहारी वाजपेयी यांनी पुण्यामध्ये झालेल्या एका भाषणामध्ये आपल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे आणि त्यांच्या काव्याचे श्रेष्ठत्त्व आपल्या सुंदर रसाळ शैलीमध्ये केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यीक पु. ल. देशपांडे होते.

सावरकरांच्या कवी या रुपानंतर मला जर काय भावले असेल तर त्यांचं समाजसुधारक असणं. रत्नागिरीमध्ये नजरकैदैत राहिल्यावरही त्यांनी आपल्या विचारांमध्ये समाजसुधारणा हा विषय ठेवला होता. त्यावेळेस स्वातंत्र्य हा महत्त्वाचा मुद्दा असला तरी तरी समाजाच्या विकासासाठी त्यांच्या मनात अनेक विषय असत. ते समाजाचे शिल्पकार होते, विकृतींशी लढणारे योद्धे होते आणि वाईट चालीरितींचे निर्मूलन करणारे सुधारक होते असे  सावरकरांचे वर्णन अटलबिहारी वाजपेयी यांनी केले होते.

पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवासआपल्या भाषणामध्ये वाजपेयी यांनी स्वातंत्र्यवीरांचे वर्णन एका अनोख्याप्रकारे केले होते. सुरुवातीलाच त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणजे काय? हे केवळ 'त' या शब्दांचा वापर करुन सांगितले होते. ते म्हणाले होते,सावरकर माने तेजसावरकर माने त्यागसावरकर माने तपसावरकर माने तत्वसावरकर माने तर्कसावरकर माने तारुण्यसावरकर माने तीरसावरकर माने तलवारसावरकर माने तिलमिलाहटसावरकर माने तितिक्षासावरकर माने तिखापनअसे म्हणून वाजपेयी यांनी पुढचे वाक्य मराठीत 'सावरकर म्हणजे तिखट' असे उच्चारले. त्यानंतर एखादी व्यक्ती एकाचवेळेस कवी आणि क्रांतीकारक कशी असू शकते याचे मला नेहमीच आश्चर्य वाटत राहिल्याचे सांगत सावरकरांच्या जीवनाचे वैशिष्ट्य सांगितले. शब्दांचे विश्व घेऊन उंच भरारी मारायची आणि त्याचवेळेस परिस्थितीच भान ठेवायचं अत्यंत कठिण असते. अंदमानमध्ये सावरकरांना आपल्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा काळ घालवावा लागला होता. ते शब्दांचे शिल्पकार होते पण त्यांच्या भावना उदात्त होत्या असा शब्दांमध्ये सावरकरांचा गौरव वाजपेयी यांनी केला होता. ''मला विनायक दामोदर सावरकरांची ओळख एक कवी म्हणूनच झाली होती. सावरकरांच्या कवितांचे गायन आम्ही करत असू. मी ग्वाल्हेरचा असल्यामुळे माझे मराठी फारसे चांगले नव्हते. कारण ग्वाल्हेरची स्वतःची अशी वेगळी मराठी आहे. ती पुणेकरांना समजणार नाही. 'वरचा मजला खाली (रिकामा) आहे' असं मराठी आम्ही बोलतो. जर मजला वरती आहे तर तो खाली कसा असा प्रश्न तुम्हाला पडेल पण ते ग्वाल्हेरचं स्वतःचं मराठी आहे. मी सावरकरांच्या कवितांचा अनुवाद करायचा प्रयत्न केला होता तेव्हा मला त्यांच्या शब्दांच्या शक्तीची कल्पना आली होती. एखादा कवी क्रांतीकारक कसा असू शकतो हा प्रश्न मला पडला होता. कवी कल्पना आणि यथार्थदृष्टी यांचा समन्वय सावरकरांनी केला होता'', अशा शब्दांमध्ये वाजपेयी यांनी सावरकरांच्या शब्दांचे, कवितांचे, त्यांच्या त्यागाचे वर्णन केले होते. वक्तृत्त्वशैलीचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींसाठी हे भाषण आदर्श उदाहरण ठरेल.

 

 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरPuneपुणे