शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

Atal Bihari Vajpayee : ...म्हणून त्यांनी इस्टेट बनवली नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:56 AM

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते.

राजकारणात माणसे झटपट श्रीमंत होतात. नव्हे तर श्रीमंत होण्यासाठीच अलीकडे लोक राजकारणात येऊ पाहतात हा एकूण कल आहे. सारेच असे नसतील. पण अपवाद मिळणे कठीण. पण वाजपेयींचे सारेच जगावेगळे होते. चार दशके राजकारणात राहूनही त्यांनी इस्टेट बनवली नाही. जमीन तर सोडा, त्यांचं स्वत:च घरही उरलेले नव्हतं. ग्वाल्हेरमधले वडिलोपार्जित घर त्यांनी फार पूर्वीच देऊन टाकलं. तिथे वाचनालय आहे.सत्तेचा त्यानी स्वत:साठी तर उपयोग केलाच नाही. पण आपल्या कुटुंबियांनाही त्या मोहापासून दूर ठेवले. ‘अपने दम पे खडे रहो. नही तो भांग पीकर पडे रहो’ असे त्यांचं घरच्यांना सांगणं असे. आग्रा येथे राहणाऱ्या त्यांच्या बहिणीकडे गॅस नव्हता. खासदारांना गॅस कनेक्शनचा कोटा असतो. पण त्या कोट्यातून अटलजींनी तिला गॅस दिला नाही आणि बहिणीनेही मागितला नाही. आता बोला! राजकीय जीवनात वावरताना अटलजींनी किती संयम राखला असेल याची कल्पना या लहानशा उदाहरणावरून यावी. ते म्हणतही. मी कशाला भीत नाही. भीतो तर बदनामीला.उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील बटेश्वर हे अटलबिहारी यांचे मूळ गाव. बटेश्वरमध्ये प्राचीन काळी कान्यकुब्ज ब्राह्मणांपैकी कुणी वाजपेय यज्ञ केला . तेव्हापासून त्या परिवारात ‘वाजपेयी’ हे आडनाव पडलं असे मानलं जातं. पणजोबा, आजोबा, वडील... संस्कृतचे सारे विद्वान होते. साहित्यप्रेमी होते. बटेश्वरहून हे कुटुंब ग्वाल्हेरला आलं. अटलबिहारी यांचे वडील कृष्णबिहारी. मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर संस्थानात ते राजमान्यकवी होते. व्यवसायाने शिक्षक होते. घरी श्रीमंती नसली तरी खाऊनपिऊन सुखी घर होतं. अटलबिहारींना तीन भाऊ आणि तीन बहिणी. अवधबिहारी, सदाबहारी आणि प्रेमबिहारी. अटलबिहारी हे या तिघांच्या पाठीवर जन्माला आले. अटलबिहारी शाळेत हुशार होते. पण खोडकर होते. त्यासाठी त्यांनी वडिलांच्या हातचा मारही खाल्ला. घरचे लाडके. त्यांची आई त्यांना लाडाने ‘अटल्ला’ म्हणायची. आईच्या हातचे पदार्थ त्यांना खूप आवडायचे. मूगडाळीचे लाडू, बाजरीची शिळी भाकरी, दालबाटी... ग्वाल्हेरमधल्या एका ठिकाणचा समोसा, कचोरी त्यांना खूप आवडायची. ग्वाल्हेर तर जीव की प्राण. कुटुंबवत्सल होते. घरी गेले की, राजकारण विसरून जात. घरात कुणाचं लग्न, मुंज असो, हजर रहायचे. त्यांनी लग्न केले नाही. पण भावाबहिणींची मिळून दीडशे माणसं आहेत. इतर मुलांप्रमाणे अटलबिहारी यांनीही लग्न करावे, संसार थाटावा अशी त्यांच्या आईवडिलांची खूप इच्छा होती. आईनं तर अनेक वेळा रडून त्यांना राजी करू पाहिलं. पण अटलजी बधले नाहीत. पूर्ण वेळ संघाचं काम करण्यासाठी ते बाहेर पडले होते. त्यामुळे लग्नाचा विचार त्यांनी मनातून काढून टाकलाहोता.गर्दीत राहूनही एकटे ! साठच्या दशकापासून वाजपेयींनी कौल कुटुंबाला आणि त्या कुटुंबाने वाजपेयींना आपलं मानले. जणू अटलजींचं ‘दत्तक’ कुटुंब ! नमिता भट्टाचार्य ही मानलेली मुलगी दिल्लीतल्याच एका शाळेत शिक्षिका आहे. दत्तक नात नेहा ही त्यांची अतिशय लाडकी. लग्न न करताही कुटुंबवत्सल, सतत माणसांच्या गर्दीत राहूनही एकटे वाजपेयी, गेलेही एकटे एकटे....त्यांची एक प्रसिद्ध कविता आहे -‘क्या हार में क्या जीत में, किंचित नहीं भयभीत मैंसंघर्ष पथ पर जो भी मिला, वो भी सही ये भी सही’

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान