शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Atal Bihari Vajpayee : उदारमतवादी चेहरा आता केवळ स्मृतीतच!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2018 4:18 AM

केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते.

- सुरेश भटेवरानवी दिल्ली : अटलबिहारी वाजपेयीपंतप्रधान असताना २00२ साली ७, रेसकोर्स या त्यांच्या निवासस्थानी घडलेला एक प्रसंग. केंद्रात वाजपेयी सत्तेवर आहेत, तरीही राम मंदिराच्या उभारणीसाठी केंद्र सरकारची काहीच मदत होत नाही, या कारणास्तव राम मंदिर आंदोलनातले समस्त महंत, साधू अन् विहिंपचे नेते सरकारवर संतापले होते. विविध आखाड्यांचे महंत व साधू यांचे शिष्टमंडळ एके दिवशी वाजपेयींना भेटायला दिल्लीला आले. हा प्रसंग काही निवडक मराठी पत्रकारांना (केंद्रीय मंत्री प्रमोद महाजनांच्या सौजन्याने) प्रत्यक्ष पाहता आला. महंत व साधूंनी त्रागा व्यक्त करीत यावेळी वाजपेयींचे लक्ष राम मंदिराच्या विषयाकडे वेधले. एक तरुण साधू आक्रस्ताळ्या आवाजात म्हणाला, ‘वाजपेयीजी, हम सबने बचपनसे अखंड भारत का सपना देखा है। सत्ता के शीर्ष स्थानपर आप बैठे है। आप कुछ करते क्यों नही? हम ये उम्मीद अब छोड दे क्या? त्या तरुण साधूकडे पाहत वाजपेयींनी सवयीनुसार एक पॉज घेतला. समस्त साधू महंतांचे चेहरे नीट न्याहाळले. मग एका वाक्यात उत्तर देत म्हणाले, अखंड भारतका सपना देखते हो, जरा शांतीसे सोचो... अगर भूमी आयेगी, तो लोग भी तो आयेंगे, तब क्या करोगे? वाजपेयींचे उत्तर ऐकल्यावर सारे शिष्टमंडळ निरुत्तर झाले.वन लायनर म्हणजे एका वाक्यात उत्तर देण्यात वाजपेयींचा हातखंडा होता. भारतीय राजकारणात वाजपेयी भाजपचा अस्सल उदारमतवादी चेहरा होते. त्यांचे टीकाकार म्हणायचे की, कायम सौम्य स्मित झळकत असलेला वाजपेयींचा चेहरा हा केवळ मुखवटा आहे; त्यामागे रा.स्व.संघाचा हिंदुत्ववादी चेहरा लपलेला आहे. पण पक्षाच्या व्यासपीठावर वाजपेयी यांनी अडवाणींच्या रथयात्रेविरोधात भूमिका घेतली होती. गुजारात दंगलीबाबतही वाजपेयी म्हणाले होते की, ‘या घटनांबाबत केवळ विरोधकच व्यथित आहेत काय? केंद्र सरकारही तितकेच दु:खी आहे. सर्वांनाच शरमेने मान खाली घालायला लावणारी ही घटना आहे’.

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीprime ministerपंतप्रधान