शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

Atal Bihari Vajpayee Death : मुझे मृत्यू से डर नही है! डर है तो बदनामीसे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2018 6:23 PM

Atal Bihari Vajpayee Death : भगवान रामाचे स्मरण करत मला मृत्यूची भीती नाही, मला भीती आहे फक्त बदनामीची, असं सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला.

मुंबई : अटलबिहारी वाजपेयी. २५ डिसेंबर १९२४ रोजी ग्वाल्हेरमध्ये जन्मलेल्या या व्यक्तीने सलग सात दशके भारतीय राजकीय आणि सामाजिक जीवनावर आपला अमिट ठसा उमटवला. राजकारणात केवळ सत्ताप्राप्तीसाठी आपण आलो नाही, तर देशसेवेसाठी आलो हे ठणकावून सांगण्याची हिंमत त्यांच्यामध्ये होती. 

१९९६ साली राष्ट्रपतींनी त्यांना सर्वाधिक जागा मिळवणा-या पक्षाचा नेता म्हणून सरकार स्थापन करण्यास आमंत्रित केले व इतर पक्षांशी बोलण्यास अवधी दिला. मात्र वाजपेयी यांना सत्तेची हाव सुटली आहे, असा आरोप विरोधी पक्षांकडून होऊ लागताच मुदत संपण्याआधीच वाजपेयी यांनी लोकसभेत शक्ती परीक्षणास सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस बोलताना वाजपेयी म्हणाले होते, माझ्यावर सत्तेचा मोह झाल्याचा आरोप होत आहे. पण संशय निर्माण होऊ नये म्हणूनच मी मुदतपूर्व शक्ती परीक्षणाला सामोरे जायचा निर्णय घेतला. महाराष्ट्रात काँग्रेस नेत्यांनी स्वतःचा पक्ष मोडून आमच्या मदतीने सरकार तयार केले होते. पण स्वतःचा पक्ष मोडून सत्ता चालून आली तर मी त्या सत्तेला चिमटीनेही स्पर्श करणार नाही, असे बाणेदार उत्तर वाजपेयी यांनी दिले होते. भगवान रामाचे स्मरण करत मला मृत्यूची भीती नाही, मला भीती आहे फक्त बदनामीची, असं सांगत त्यांनी पदाचा राजीनामा दिला. पण लोकसभेसह देशातल्या मोठ्या वर्गाची मने जिंकली.

(Atal Bihari Vajpayee: अटलबिहारींचा 'आठ'वावा प्रताप; या गोष्टींसाठी सदैव ऋणी राहील भारत!)

‘बाधाएँ आती हैं आएँघिरें प्रलय की घोर घटाएँपॉंवो के नीचे अंगारेसिर पर बरसें यदि ज्वालाएँनिज हाथों में हँसते-हँसतेआग लगाकर जलना होगाकदम मिलाकर चलना होगा’’

वाजपेयी यांचे हे भाषण विशेष गाजले. काही काळापुरते त्यांना पंतप्रधानपदापासून लांब राहावे लागले तरी पुढे त्यांनी आघाडी सरकार यशस्वीरीत्या सांभाळले. विविध प्रांतातल्या विविध प्रादेशिक पक्षांबरोबर मिळतेजुळते घेत आघाडीचा एक नवा प्रयोग त्यांनी पूर्णकाळ तडीस नेला. हे सर्वांना बरोबर घेऊन जाणंच त्यांच्या वेगळेपणाचं दर्शक आहे.

(Atal Bihari Vajpayee: पत्रकार ते पंतप्रधानपदापर्यंतचा अटल बिहारी वाजपेयींचा राजकीय प्रवास)

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयी