शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
2
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
3
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
4
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
5
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
6
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
7
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
8
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
9
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
10
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
11
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
12
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
13
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
14
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
15
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
16
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
17
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
18
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
19
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
20
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!

Atal Bihari Vajpayee : आणीबाणी संपल्यावर वाजपेयींच्या 'या' तीन ओळी ऐकून भारावली होती जनता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:03 IST

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता. अटलबिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीयेत. अनेक गंभीर आजारांशी अनेक वर्ष लढा देत अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. त्यांच्या अनेक गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषण म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी रामलीला मैदानात केलेलं भाषण. 

वाजपेयी यांना खऱ्या अर्थाने देशाचे लोकनेता म्हणता येईल. ते त्या मोजक्याच नेत्यांपैकी एक होते ज्यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली जात होते. हिंदी भाषेवरील त्यांच्या प्रभूत्वामुले ते त्यांच्या भाषणात अशा काही शब्दांचा प्रयोग करायचे की, त्यांचं भाषण ऐकणारी जनता भारावून जायची. विरोधीपक्ष नेता म्हणून केलेलं भाषण असो, संयुक्त राष्ट्र संघात केलेलं भाषण असो ते परिस्थितीनुसार आपल्या भाषणात शब्दांचा प्रयोग करायचे. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. विरोधी पक्षांनी याचा जोरदार विरोध केला होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. आणि १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यावर दिल्लीतील रामलीला मैदानात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये अटलबिहारी वाजपेयी होते. ते भाषण देण्यासाठी येताच उपस्थित हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला होता. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी गर्दीला शांत राहण्याचा इशारा केला. त्यानंतर आपल्या खास अंदाजात त्यांनी थोडा वेळ घेत ते म्हणाले 'बाद मुद्दत मिले हैं दिवाने'. यानंतर त्यांनी थोडा पॉझ घेतला आणि आपले डोळे काही वेळासाठी बंद केले. यावेळी रामलीला मैदानातील जनता जोरजोरात नारे लावू लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाजपेयी यांनी डोळे उघडून लोकांना शांत राहण्याचा इशारा केला. पुढे म्हणाले, 'कहने सुनने को बहुत हैं अफसाने'. हे ऐकल्यावर पुन्हा एकदा मैदानातील लोक जोरजोरात नारे देऊ लागले होते. पुढे वाजपेयी आपल्या ओळी पूर्ण करत म्हणाले की, 'खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी भला कौन जाने'.

या तीन ओळींमध्ये वाजपेयी यांनी आणीबाणी संपल्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर जमलेल्या लोकांनी इतके नारे लावले की, वाजपेयी आणखी काही बोलण्याची गरजच पडली नाही. यावरुनच वाजपेयी कशाप्रकारे शब्दांचे जादुगर होते आणि त्यांना ऐकल्यावर लोक कसे वेडे होते हे यातून बघायला मिळतं.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत