शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Atal Bihari Vajpayee : आणीबाणी संपल्यावर वाजपेयींच्या 'या' तीन ओळी ऐकून भारावली होती जनता!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:03 IST

Atal Bihari Vajpayee : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता.

नवी दिल्ली : देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची भाषणे आणि त्यात कवितांचा ते करत असलेला चपखल वापर नेहमीच चर्चेचा विषय होता. अटलबिहारी वाजपेयी आज आपल्यात नाहीयेत. अनेक गंभीर आजारांशी अनेक वर्ष लढा देत अखेर त्यांची प्राणज्योत आज मावळली. त्यांच्या अनेक गाजलेल्या भाषणांपैकी एक भाषण म्हणजे आणीबाणी संपल्यानंतर त्यांनी रामलीला मैदानात केलेलं भाषण. 

वाजपेयी यांना खऱ्या अर्थाने देशाचे लोकनेता म्हणता येईल. ते त्या मोजक्याच नेत्यांपैकी एक होते ज्यांना ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी केली जात होते. हिंदी भाषेवरील त्यांच्या प्रभूत्वामुले ते त्यांच्या भाषणात अशा काही शब्दांचा प्रयोग करायचे की, त्यांचं भाषण ऐकणारी जनता भारावून जायची. विरोधीपक्ष नेता म्हणून केलेलं भाषण असो, संयुक्त राष्ट्र संघात केलेलं भाषण असो ते परिस्थितीनुसार आपल्या भाषणात शब्दांचा प्रयोग करायचे. 

१९७५ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी घोषित केली होती. विरोधी पक्षांनी याचा जोरदार विरोध केला होता. मोठ्या प्रमाणात विरोध झाल्याने इंदिरा गांधी यांना माघार घ्यावी लागली होती. आणि १९७७ मध्ये निवडणुकांची घोषणा करण्यात आली होती. आणीबाणी संपल्यावर दिल्लीतील रामलीला मैदानात एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या रॅलीमध्ये अटलबिहारी वाजपेयी होते. ते भाषण देण्यासाठी येताच उपस्थित हजारो लोकांनी त्यांच्या नावाचा जयघोष केला होता. 

अटलबिहारी वाजपेयी यांनी गर्दीला शांत राहण्याचा इशारा केला. त्यानंतर आपल्या खास अंदाजात त्यांनी थोडा वेळ घेत ते म्हणाले 'बाद मुद्दत मिले हैं दिवाने'. यानंतर त्यांनी थोडा पॉझ घेतला आणि आपले डोळे काही वेळासाठी बंद केले. यावेळी रामलीला मैदानातील जनता जोरजोरात नारे लावू लागली होती. त्यानंतर पुन्हा एकदा वाजपेयी यांनी डोळे उघडून लोकांना शांत राहण्याचा इशारा केला. पुढे म्हणाले, 'कहने सुनने को बहुत हैं अफसाने'. हे ऐकल्यावर पुन्हा एकदा मैदानातील लोक जोरजोरात नारे देऊ लागले होते. पुढे वाजपेयी आपल्या ओळी पूर्ण करत म्हणाले की, 'खुली हवा में जरा सांस तो ले लें, कब तक रहेगी आजादी भला कौन जाने'.

या तीन ओळींमध्ये वाजपेयी यांनी आणीबाणी संपल्यावरची आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यानंतर जमलेल्या लोकांनी इतके नारे लावले की, वाजपेयी आणखी काही बोलण्याची गरजच पडली नाही. यावरुनच वाजपेयी कशाप्रकारे शब्दांचे जादुगर होते आणि त्यांना ऐकल्यावर लोक कसे वेडे होते हे यातून बघायला मिळतं.  

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीIndiaभारत