शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

'पीयूष जैनचा सपाशी काही संबंध नाही, भाजपनं चुकून आपल्याच व्यापाऱ्यावर टाकला छापा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 19:31 IST

गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर विभागाने आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये, कानपूरमधील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 257 कोटी रुपये रोख, 25 किलो सोने आणि 250 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे.

उन्नाव - समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मंगळवारी कानपूर येथील अत्तर व्यापारी पीयूष जैन याचा आपल्या पक्षाशी काही संबंध नाही, असे म्हटले आहे. तसेच, भाजपची खिल्ली उडवत, त्यांनी चुकून आपल्याच व्यापाऱ्यावर छापा टाकल्याचे म्हटले आहे. एवढेच नाही, तर जैनच्या सीडीआर (कॉल डिटेल रेकॉर्ड)मधून त्याच्या संपर्कात असलेल्या अनेक भाजप नेत्यांची नावेही बाहेर येतील, असा दावाही अखिलेश यांनी केला आहे. ते समाजवादी रथयात्रा सुरू होण्यापूर्वी माध्यमांशी बोलत होते.

अखिलेश म्हणाले, 'भाजपने चुकून आपल्याच उद्योगपतीवर छापा टाकला आहे.' त्यांनी दावा केला, की समाजवादी अत्तर (परफ्यूम) पीयूष जैन नव्हे तर एमएलसी पुष्पराज जैन यांनी तयार केले होते. भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, "सत्ताधारी भाजपने डिजिटल चुकीने आपल्याच व्यापाऱ्यावर (पीयूष जैन) छापा टाकला." यावेळी, एवढ्या मोठ्या प्रमाणावर रोकड सापडल्याने, नोटाबंदी आणि जीएसटी अपयशी ठरल्याचे सिद्ध झाले आहे, असेही अखिलेश म्हणाले. 

गेल्या काही दिवसांत प्राप्तिकर विभागाने आणि केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये, कानपूरमधील परफ्यूम व्यापाऱ्याच्या घरातून सुमारे 257 कोटी रुपये रोख, 25 किलो सोने आणि 250 किलो चांदी जप्त करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पीयूष जैनला सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

तत्पूर्वी, अत्तर व्यापारी पियुष जैनचा समाजवादी पक्षाशी संबंध होता, असा आरोप भाजप नेत्यांनी केला होता. हरदोईच्या सभेत मंगळवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले होते, की काही दिवसांपूर्वी आयकर विभागाने छापे टाकले तेव्हा अखिलेश यांच्या पोटात दुखायला सुरुवात झाली होती. राजकीय द्वेषापोटी छापे टाकले जात असल्याचे ते म्हणू लागले. मात्र, आज समाजवादी अत्तर बनवणाऱ्याकडे टाकलेल्या छाप्यात अडीचशे कोटी रुपये सापडले आहेत, यामुळे त्यांना काय बोलावे सुचेनासे झाले आहे.

टॅग्स :Akhilesh Yadavअखिलेश यादवUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपाSamajwadi Partyसमाजवादी पार्टी