शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Assembly Election: कोण मुख्यमंत्री? राजस्थानात काँग्रेस-भाजपसमोर पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 06:22 IST

Assembly Election: राजस्थानमध्ये काँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे.

- संजय शर्मानवी दिल्ली - राजस्थानमध्येकाँग्रेस किंवा भाजपचे सरकार आले तरी मुख्यमंत्री निवडताना दोन्ही पक्षांसमोर पेच आहे. राजस्थान, मध्य प्रदेश व छत्तीसगडमध्ये दोन्ही पक्षांत थेट मुकाबला आहे. तिन्ही राज्यांत भाजपने कोणालाही मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केलेला नाही. काँग्रेसनेही मध्य प्रदेशात कमलनाथ यांना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केलेले आहे. परंतु, छत्तीसगड व राजस्थानमध्ये कोणत्याही नेत्यांबाबत अशी घोषणा केलेली नाही.

राजस्थानात द्विधा मन:स्थिती दोन्ही पक्षांना सर्वांत जास्त आव्हानांची स्थिती यावेळी राजस्थानमध्ये असणार आहे. काँग्रेसचेच सरकार पुन्हा सत्तेत आले तर पुन्हा अशोक गेहलोत मुख्यमंत्री होतात किंवा सचिन पायलट यांच्या नावावर पक्षश्रेष्ठी शिक्कामोर्तब करतात, हे पाहावे लागेल. सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण, याबाबत राजस्थान भाजपमध्ये द्विधा स्थिती आहे. वसुंधरा राजे यांना भाजपचे नेतृत्व मुख्यमंत्री करू इच्छित नाही. उर्वरित नेत्यांमध्ये गजेंद्रसिंह शेखावत, अर्जुनराम मेघवाल, ओम बिरला याबरोबरच आणखी एक नाव समोर येत आहे. आणि ते म्हणजे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव. ते मूळचे राजस्थानचे आहेत. 

छत्तीसगडमध्ये रमण सिंह हाच पर्याय - छत्तीसगडमध्ये काँग्रेसने भलेही भूपेश बघेल यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर आणले नसले तरी महादेव ॲपमध्ये त्यांचे नाव आलेले आहे. परंतु, आमदारांचे पाठबळ बघेल यांच्या पाठीशी जास्त आहे. - अशा स्थितीत टी. एस. सिंहदेव शर्यतीत खूपच मागे आहेत. भाजप छत्तीसगडमध्ये नेताविहीन आहे. रमण सिंह नसतील तर कोणताही पर्याय दिसत नाही. 

मध्य प्रदेशात चित्र स्पष्ट मध्य प्रदेशात चित्र बरेचसे स्पष्ट झालेले आहे. काँग्रेसचे सरकार आल्यास कमलनाथ मुख्यमंत्री होतील आणि भाजपचे सरकार आल्यास मुख्यमंत्रीपदासाठी सर्वांत मजबूत दावेदार केंद्रीय मंत्री प्रल्हाद सिंह पटेल असू शकतील. ते ओबीसीतून येतात. शिवराज सिंह चौहान यांना दोन्ही स्थितीत यावेळी केंद्रात जावे लागेल, अशी शक्यता आहे. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमरही मजबूत दावेदार होते. परंतु, त्यांच्या पुत्राबाबत व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे त्यांचा दावा कमजोर झाल्याचे मानले जात आहे. उर्वरित दावेदारांमध्ये कैलाश विजयवर्गीय, नरोत्तम मिश्रा हे ओबीसी नसल्यामुळे मागे पडले आहेत.

राजस्थानमध्ये ६८ टक्के मतदानजयपूर - राजस्थानमध्ये २०० सदस्यांच्या राज्य विधानसभेच्या १९९ जागांसाठी ६८ टक्के मतदान झाले आहे. राज्यात मुख्य लढत काँग्रेस आणि भाजपमध्ये आहे. काही भागांत वेगवेगळ्या उमेदवारांच्या समर्थकांमध्ये किरकोळ वाद झाले. सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजता मतदान समाप्त झाले. सिरोही जिल्ह्यातील चारवली गावाने मतदानावर बहिष्कार टाकला. 

राज्यात एकूण ३६,१०१ ठिकाणी ५० हजारांहून अधिक मतदान केंद्रे उभारण्यात आली होती. पाच कोटी २६ लाखांहून अधिक मतदार आहेत. एकूण १,८६२ उमेदवार रिंगणात आहेत. ७०,००० पोलिस कर्मचाऱ्यांसह १.७० लाखांहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. काँग्रेसविरोधात सत्ताविरोधी लाट नाही. पक्ष राज्यात पुन्हा सरकार स्थापन करेल, असे दिसते काँग्रेस पुन्हा सरकार स्थापन करेल.    - अशोक गेहलोत, मुख्यमंत्रीप्रत्यक्षात अंडरकरंट आहे; पण तो भाजपच्या बाजूने आहे. ३ डिसेंबरला भाजपचे कमळ फुलणार आहे.    - वसुंधरा राजे, भाजप ज्येष्ठ नेत्या

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीcongressकाँग्रेसBJPभाजपाRajasthanराजस्थानMadhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगड