शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

'खासदार' गंभीर भडकला; मुस्लीम तरुणाला मारणाऱ्यांना धर्मनिरपेक्षतेचा उपदेश केला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 12:14 IST

गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.

ठळक मुद्देअल्पसंख्याकांच्या मनातील काल्पनिक भीती काढण्याबाबत नरेंद्र मोदींनी सूतोवाच केलं आहे.गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.'त्यांनी जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली. मी नाही म्हणालो, तेव्हा मला मारहाण केली'

लोकसभेच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांची त्सुनामी उसळून भाजपाला अभूतपूर्व यश मिळालं आहे. या विराट विजयाने हवेत जाऊ नका, संयमाने वागा, असा सल्ला खुद्द मोदींनी एनडीए नेता निवडीच्या बैठकीत दिला. अल्पसंख्याकांच्या मनातील काल्पनिक भीती काढण्याबाबतही त्यांनी सूतोवाच केलं. परंतु, स्वतःला धर्माचे ठेकेदार समजणारी मंडळी 'फिर एक बार... मोदी सरकार'मुळे भलतीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळतंय. गुरुग्राममध्ये अज्ञातांनी मुस्लीम तरुणाला मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. त्यावरून, माजी क्रिकेटवीर आणि दिल्लीतील भाजपाचा नवनिर्वाचित खासदार गौतम गंभीर याने तीव्र संताप व्यक्त करत हा देश धर्मनिरपेक्ष असल्याचा ठणकावलं आहे. 

मशिदीतून परतणाऱ्या मुस्लीम तरुणाला एका जमावाने वाटेत रोखलं, त्याची टोपी काढून घेतली आणि 'जय श्रीराम'चे नारे द्यायला सांगितलं. त्याने नकार दिल्यावर त्याला काठीने बेदम मारहाण करण्यात आली. मोहम्मद बरकत आलम (२५) असं या तरुणाचं नाव असून त्यानं या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सदर बाजार गल्लीत हा प्रकार घडला. चार तरुणांनी आधी मला 'भारत माता की जय' म्हणायला सांगितलं. त्यानुसार मी म्हटलं सुद्धा. पण मग त्यांनी जय श्रीराम म्हणण्याची जबरदस्ती केली. मी नाही म्हणालो, तेव्हा मला मारहाण केली, असं आलमनं म्हटलं आहे. त्याच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी अज्ञातांविरोधात एफआयआर दाखल केला आहे.

ही घटना समजल्यानंतर, खासदार गौतम गंभीरनं आपल्या स्वभावाप्रमाणे 'स्ट्रेट ड्राइव्ह' लगावला आहे. मुस्लीम युवकाची टोपी उतरवून त्याला 'जय श्रीराम' म्हणायला सांगितलं गेलं, हे खेदजनक आहे. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कठोर कारवाई केली पाहिजे. आपला देश धर्मनिरपेक्ष आहे. इथे जावेद अख्तर 'ओ पालन हारे निर्गुण और न्यारे'सारखं आणि राकेश मेहरा 'अर्जियां'सारखं गाणं लिहितात, अशी ट्विप्पणी त्यानं केली आहे.  

लोकसभा निवडणुकीत गौतम गंभीरनं दिल्ली मतदारसंघातून मोठा विजय मिळवला. कायमच धर्मनिरपेक्ष मतं मांडणाऱ्या गंभीरनं विकासाच्या मुद्द्यावरच निवडणूक लढवली होती. त्यामुळेच मुस्लीम युवकाला झालेल्या मारहाणीबद्दल त्यानं तीव्र नाराजी आणि संताप व्यक्त केला आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालGautam Gambhirगौतम गंभीरNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा