शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम दहशतवादी हल्ला: पाकिस्तानी उच्चायोगाने केक मागविला; कशासाठी?
2
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
3
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
4
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
5
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
6
Pahalgam Attack Video: दहशतवाद्यांनी पर्यटकांची अशी केली हत्या; गोळ्या झाडतानाचा व्हिडीओ समोर
7
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
8
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
9
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
10
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
11
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
12
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?
13
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! २६ एप्रिलपासून 'या' भागांत २४ तास पाणीपुरवठा राहणार बंद
14
मित्राकडून महागडं गिफ्ट घेतलं तर द्यावा लागू शकतो Tax! ९०% लोकांना Gift वरील टॅक्सचा नियमच माहीत नाही
15
मनिषाचा तो एक ईमेल ज्यामुळे डॉक्टर झाले व्यथित; 'त्या' मेलमध्ये दडलंय काय? झालं उघड
16
हृदयद्रावक! बुलेट चालवताना २० वर्षीय तरुणाला आला हार्ट अटॅक; वेदनेने तडफडत असतानाच...
17
'ज्याने माझ्या भावाला मारलं, मला त्याचं शीर हवंय', लेफ्टनंट विनय नरवालांच्या बहिणीचा मुख्यमंत्र्यांसमोर आक्रोश
18
कलमा म्हणजे काय? जो दहशवाद्यांसमोर पढल्याने पहलगाममध्ये वाचले एका हिंदू प्राध्यापकाचे प्राण
19
भरमैदानात हार्दिक पांड्यानं जयवर्धनेशी घातला वाद? दोघांमधील संभाषण कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडीओ
20
आत्महत्येपूर्वी डॉ. वळसंगकरांनी केला मृत्यूपत्रात बदल; २० टक्के हिस्सा कुणाला दिला?

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्समध्ये आसामने नोंदवली 1.9 कोटी लोकांची नावे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2018 12:59 IST

एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा  (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत.

ठळक मुद्देया यादीच्या नोंदणीची प्रक्रीया 2015 च्या मे महिन्यामध्ये सुरु झाली. आसाममधील 68.27 लाख कुटुंबांकडून 6.5 कोटी कागदपत्रे जमा करण्यात आली.

गुवाहाटी- एकूण 3.29 कोटी लोकसंख्या असलेल्या आसामने पहिल्या टप्प्यामध्ये नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सचा  (एनआरसी) पहिला मसुदा प्रसिद्ध केला आहे. यामध्ये 1.9 कोटी लोकांची नावे समाविष्ट आहेत. उर्वरित नावांची पडताळणी चालू असल्याचे भारताचे रजिस्ट्रार जनरल शैलेश यांनी मध्यरात्री घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.या पत्रकार परिषदेत बोलताना शैलेश म्हणाले, "हा मसुद्याचा पहिला भाग आहे. यामध्ये आतापर्यंत पडताळणी 1.9 कोटी लोकांचा समावेश केला आहे. इतरांची पडताळणी झाल्यावर दुसरा मसुदा तयार होईल." एनआरसीचे राज्य समन्वयक प्रतिक हाजेला म्हणाले, "ज्यांचा पहिल्या यादीत समावेश झालेला नाही त्यांनी काळजी करण्याची आवश्यकता नाही. नावांची पडताळणी करुन यादी तयार करणं हे अत्यंत किचकट काम आहे. इतरांची कागदपत्रे तपासणे सुरु आहे."पुढील यादीबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार काम सुरु असल्याचे रजिस्ट्रार जनरल शैलेश यांनी सांगितले. ही सर्व प्रक्रिया 2018मध्येच पूर्ण होईल. या यादीच्या नोंदणीची प्रक्रीया 2015 च्या मे महिन्यामध्ये सुरु झाली. आसाममधील 68.27 लाख कुटुंबांकडून 6.5 कोटी कागदपत्रे जमा करण्यात आली. या यादीबाबत आक्षेपांची नोंदणी करून त्यातील दुरुस्ती अंतिम यादीत समाविष्ट केली जाईल.ही पहिली यादी आसाममधील एनआरसी सेवा केंद्रांमध्ये सकाळपासून पाहता येईल आणि तसेच ऑनलाइन माहितीही तपासता येईल. त्याचप्रमाणे एसएमएस सेवेचा लाभ घेऊनही नाव तपासता येईल. आसाममध्ये बांगलादेशातून मोठ्या प्रमाणात विस्थापित व निर्वासित लोक आले होते. एनआरसीची यादी असणारे आसाम हे एकनेव राज्य असून 1951 साली या राज्याने पहिली यादी प्रसिद्ध केली होती.

टॅग्स :AssamआसामIndiaभारत