शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आसामची NRC यादी वेबसाइटवरून गायब?, गृह मंत्रालयाकडून स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 2:11 PM

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती.

नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसी या मुद्द्यांवरून सध्या देशातील राजकीय वातावरण तापले आहे. सीएए आणि एनआरसीच्या विरोधात ठिकठिकाणी विरोधी पक्षांकडून आंदोलने करण्यात येत आहेत. तर दुसरीकडे सत्ताधारी भाजपाकडून सीएए आणि एनआरसीच्या समर्थनार्थ रॅली काढण्यात येत आहे. यातच आता आसाम एनआरसीच्या डेटा संदर्भात वाद सुरू झाला आहे.

आसाममध्ये गेल्यावर्षी एनआरसीची प्रक्रिया झाली होती. त्याचा सर्व डेटा अधिकृत वेबसाइटवरून गायब झाला आहे. यावरून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. मात्र, यावर आता गृह मंत्रालयाने उत्तर दिले आहे. एनआरसी संबंधित डेटा पूर्णपणे सुरक्षित आहे. काही तांत्रिक अडचणीमुळे डेटा वेबसाईटवर दिसत नाही, असे गृहमंत्रालयाने म्हटले आहे. 

गेल्या काही दिवसांपूर्वी आसाम एनआरसीचा डेटा गृह मंत्रालयाद्वारे http://www.nrcassam.nic.in या वेबसाइटवर अपलोड करण्यात आला होता. यामध्ये संपूर्ण यादी होती. मात्र, अचानक हा डेटा हटविण्यात आला आणि वेबसाइट सुद्धा सुरू होत नव्हती. यानंतर, अनेक अफवा पसरू लागल्या आणि यासंदर्भात गृह मंत्रालयाकडे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाने सर्व अफवा दूर करत एनआरसीचा सर्व डेटा सुरक्षित असल्याचे सांगितले. तसेच, वेबसाईटवर क्लाउडच्या कारणास्तव डेडा दिसू शकत नाही. हा बिघाड लवकरच दुरुस्त करण्यात येईल, असेही सांगण्यात आले आहे.

एनआरसीचे राज्य कॉर्डिनेटर (समन्वयक) हितेश देव शर्मा यांनी यासंदर्भातील वृत्ताला दुजोरा दिला आहे. ते म्हणाले, "सध्या डेटा ऑफ लाइन करण्यात आला आहे. मात्र, ही चूक तांत्रिक कारणामुळे झाली आहे. वेबसाईटच्या क्लाउड सर्व्हिसची जबाबदारी आयटी फर्म विप्रोकडे देण्यात आली होती. पण, ती ऑक्टोबर 2019 पर्यंत उपलब्ध होती. 

याचबरोबर, हितेश देव शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील कॉर्डिनेटरने यंत्रणा अपडेट केली नव्हती. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी विप्रो कंपनीने ही सुविधा बंद केली. दरम्यान, राज्य समन्वय समितीने आता यावर काम करण्यास सुरुवात केली असून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात विप्रो कंपनीला यासंदर्भात अधिकृत सूचना देण्यात आली आहेत. पुढील दोन ते तीन दिवसांत वेबसाईटवर हा सर्व डेटा दिसून येईल. 

दरम्यान, आसाममध्ये गेल्या वर्षी एनआरसीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती. ज्यामध्ये 19 लाख लोक यादीतून बाहेर झाले होते. 31 ऑगस्ट 2019 रोजी सरकारकडून एनआरसीची अंतिम यादी जाहीर करण्यात आली होती. ज्यामध्ये आसाममधील एकूण 3,30,27,661 लोकांपैकी 3,11,21004 नागरिकांची नावे आली होती. तर 19,06,657 लोक एनआरसीच्या यादीतून बाहेर झाले होते. 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयNational Register of CitizensएनआरसीAssamआसाम