शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 10:22 IST

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Assam-Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah)

नवी दिल्ली - इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. ही घटना म्हणजे अमित शाह यांचे अपयश असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यामुळेच लोकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला, असेही ते म्हणाले. याच वेळी, त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली. (Assam Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah and gives condolences to the families of those who have been killed)

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती मी आपली संवेदना व्यक्त करतो. याच बरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृह मंत्र्याचे अपयश समोर आले आहे. ते देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे." राहुल यांनी आपल्या या ट्विटसोबत घटनेचा व्हिडिओही जोडला आहे.

काय म्हणतायत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री -आसाम-मिझोरम सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाAssamआसामmizoram-pcमिजोरमcongressकाँग्रेसBJPभाजपा