शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
3
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
4
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
5
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
6
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
7
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
8
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
9
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
10
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
11
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
12
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
13
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
14
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
15
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
16
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
17
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
18
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
19
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
20
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य

Assam-Mizoram Clash: आसाम-मिझोरम वादावरून राहुल गांधी भडकले; अमित शाहंवर 'अशा' शब्दात साधला निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2021 10:22 IST

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. (Assam-Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah)

नवी दिल्ली - इशान्येकडील आसाम आणि मिझोरम या दोन राज्यांत सीमावादावरून झालेल्या हिंसाचाराच्या घटनेवरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गृह मंत्री अमित शाह यांच्यावर निशाना साधला आहे. ही घटना म्हणजे अमित शाह यांचे अपयश असल्याचे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. एवढेच नाही, तर त्यांच्यामुळेच लोकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण झाला, असेही ते म्हणाले. याच वेळी, त्यांनी या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांप्रती संवेदनाही व्यक्त केल्या. तसेच जखमी लोक लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थनाही केली. (Assam Mizoram clash Rahul Gandhi targets Amit Shah and gives condolences to the families of those who have been killed)

सीमावादावरून आसाम-मिझोरम बॉर्डरवरील लायलापूर येथे आसाम पोलीसचे 5 जवान शहीद झाले आहेत. तसेच 50 हून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. 

यासंदर्भात राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे, "या घटनेत मृत्यू झालेल्या लोकांच्या कुटुंबाप्रती मी आपली संवेदना व्यक्त करतो. याच बरोबर जखमी लोक लवकरात लवकर बरे होतील यासाठी प्रार्थना करतो. या घटनेमुळे पुन्हा एकदा गृह मंत्र्याचे अपयश समोर आले आहे. ते देशातील नागरिकांत द्वेष आणि अविश्वास निर्माण करण्याचे काम करत आहेत. यामुळे भारत आता खराब परिस्थितीचा सामना करत आहे." राहुल यांनी आपल्या या ट्विटसोबत घटनेचा व्हिडिओही जोडला आहे.

काय म्हणतायत दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री -आसाम-मिझोरम सीमेवर झालेल्या हिंसाचारासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांच्या पोलिसांना जबाबदार धरले आहे. मिझोरमच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला असून त्यांचे पोलीस शांतता राखतील असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती आसामचे मुख्यमंत्री सर्मा यांनी ट्विटरवरून दिली. तर मिझोरमचे मुख्यमंत्री जोरामथांगा यांनी आसामच्या पोलिसांनी लाठीमार करून अश्रूधूर सोडल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीAmit Shahअमित शहाAssamआसामmizoram-pcमिजोरमcongressकाँग्रेसBJPभाजपा