शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

आसाममध्ये पूरस्थिती गंभीर, 32 जिल्ह्यांना फटका, 25 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 8:29 AM

Assam flood : राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. 

आसाममधील पूरस्थिती शनिवारी चिंताजनक पातळीवर पोहोचली. या पुरामुळे चार मुलांसह आणखी आठ जणांचा मृत्यू झाला आहे. पुरातील मृतांची संख्या २५ वर पोहोचली आहे. या वर्षी राज्यातील पूर आणि भूस्खलनात एकूण मृतांची संख्या ६२ वर गेली आहे. दुसरीकडे, इतर आठ जण बेपत्ता आहेत. होजई जिल्ह्यातून चार जण बेपत्ता आहेत तर इतर चार जण बजली, कार्बी आंगलाँग पश्चिम, कोक्राझार आणि तामुलपूर जिल्ह्यातून बेपत्ता आहेत.

राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जवळपास ३१ लाख लोकांना पुराचा फटका बसला आहे. ब्रह्मपुत्रा आणि तिच्या उपनद्यांच्या पुराचे पाणी ४,२९१ गावांमध्ये शिरले असून ६६४५५.८२ हेक्टर पीक जमीन पाण्याखाली गेली आहे. बारपेटा येथील जिल्हा प्रशासनाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, येथील ग्रामस्थ त्यांच्या घरात अनेक मौल्यवान वस्तू असल्याचे सांगून घरे सोडण्यास तयार नव्हते, परंतु आम्ही कसे तरी त्यांना घरे रिकामी करण्यास राजी केले. आता त्यांना छावण्यांमध्ये नेण्याची व्यवस्था करत आहोत. तसेच, पूरग्रस्तांसाठी अन्न आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था आधीच करण्यात आली आहे. नजीकच्या भूतानमध्ये पाण्याची पातळी वाढत आहे, त्यामुळे आपल्या जिल्ह्यालाही याचा फटका बसत असून येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी बिकट होऊ शकते, असेही अधिकाऱ्याने सांगितले. 

मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील २१ जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आलेल्या ५१४ मदत शिबिरांमध्ये १.५६ लाखांहून अधिक बाधित लोकांनी आश्रय घेतला आहे. बजली, बक्सा, बारपेटा, विश्वनाथ, बोंगाईगाव, कछार, चिरांग, दरांग, धेमाजी, धुबरी, दिब्रुगढ, दिमा-हसाओ, गोलपारा, गोलाघाट, होजई, कामरूप, कामरूप (एम), कार्बी आंगलोंग पश्चिम, करीमगंज, कोक्राझार, लखीमपूर, माजुली, मोरीगाव, नागाव, नलबारी, शिवसागर, सोनितपूर, दक्षिण सलमारा, तामुलपूर, तिनसुकिया आणि उदलगुरी हे बाधित जिल्हे आहेत.

नलबारीतील एका पूरग्रस्ताने सांगितले की, गेल्या ३-४ दिवसांपासून आम्ही पुराच्या पाण्यात बुडत आहोत आणि आमची घरेही वाहून गेली आहेत. जिल्हा प्रशासनाकडून कोणीही आमच्या मदतीला आलेले नाही. आम्हाला जेवण दिले जात नाही, गेल्या चार दिवसांपासून मी उपाशी आहे. दुसरीकडे, भारतीय लष्कर, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, राज्य आपत्ती प्रतिसाद दल, आसाम पोलिसांच्या अग्निशमन आणि आपत्कालीन सेवांसह निमलष्करी दलांनी बचाव आणि मदत कार्य सुरू केले आहे. पुराचा शेकडो घरांवर वाईट परिणाम झाला आहे आणि अनेक रस्ते, पूल आणि कालवे यांचे नुकसान झाले आहे, तसेच अनेक बंधारे फुटले आहेत. ब्रह्मपुत्रा, बेकी, मानस, पगलाडिया, पुथिमारी, कोपिली आणि जिया-भराली नद्या अनेक ठिकाणी धोक्याच्या पातळीवरून वाहत आहेत.

टॅग्स :Assam Floodआसाम पूरAssamआसाम