शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

पोस्टमॉर्टेमसाठी मागितले ३०० रुपये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2018 05:07 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा मंगळवारी खांब कोसळून जे लोक मरण पावले, त्यांच्या पोस्टमॉर्टेमसाठी ३०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचे व्हिडीओमुळे उघडकीस आले आहे.

वाराणसी : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदार संघात बांधण्यात येणाऱ्या उड्डाणपुलाचा मंगळवारी खांब कोसळून जे लोक मरण पावले, त्यांच्या पोस्टमॉर्टेमसाठी ३०० रुपयांची लाच मागण्यात आल्याचे व्हिडीओमुळे उघडकीस आले आहे. त्यानंतर, रुग्णालयातील त्या कर्मचा-याला पोलिसांनी अटक केली.जितेंद्र यादव यांचे नातेवाईक दुर्घटनेत ठार झाले आहेत. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संकुलातील रुग्णालयातील कर्मचारी पोस्टमॉर्टेमसाठी ३00 रुपये लाच घेत असल्याचे व्हिडीओत दिसल्याने सर्वांनाच धक्का बसला. अन्य मृतांच्या नातेवाईकांकडूनही लाच घेतल्याचे सांगण्यात आले. लाच न दिल्यास मृतदेह आहे तसेच परत पाठवू रुग्णालयाने नातेवाईकांना ऐकवले. नातेवाईकांच्या तक्रारीनंतर कर्मचाºयाला अटक केली गेली. या अपघातप्रकरणी उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनच्या काही अधिकाºयांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांची नावे उघड करण्यात आली नाहीत. सरकारच्या बांधकाम विभागाचे मुख्य प्रकल्प अधिकारी एच. सी. तिवारी यांच्यासह चार अधिकाºयांना निलंबित केले आहे. (वृत्तसंस्था)>निकृष्ट कारभारामुळे प्रश्नचिन्हउत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनने केवळ देशातच नव्हे तर इराक, नेपाळ, येमेन या देशांतही पुलबांधणीची कामे केली आहेत. सरकारी मालकीच्या या कॉर्पोरेशनने २०१० साली बुंदेलखंड भागात बांधलेल्या एका पुलाचे उद््घाटन झाल्यानंतर तेरा दिवसांतच त्याला तडे गेले होते.लखनौ येथे बांधलेल्या एका पुलाचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचे लक्षात आले होते. आता वाराणसीमध्ये पुलाची दुर्घटना घडल्यामुळे उत्तर प्रदेश स्टेट ब्रिज कॉर्पोरेशनच्या कारभाराबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.