शहरं
Join us  
Trending Stories
1
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
2
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
3
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
4
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
5
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
6
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
7
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
8
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
9
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
10
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
11
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
12
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
13
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
14
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
15
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
16
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
17
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
18
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
19
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
20
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक

Ashok Gehlot vs Sachin Pilot : निवडणुकीपूर्वी काँग्रेसमध्ये फूट? गेहलोत सरकारविरोधात सचिन पायलट यांचे उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 13:49 IST

Ashok Gehlot vs Sachin Pilot: राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या 6 महिन्यांपूर्वी पायलट यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.

जयपूर : या वर्षी राजस्थानमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राज्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे. निवडणुकीच्या अवघ्या 6 महिन्यांपूर्वी पायलट यांनी आपल्याच सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. रविवारी जयपूरमध्ये माध्यमांशी बोलताना सचिन पायलट यांनी सीएम गेहलोत यांच्यावर मागील वसुंधरा राजे सरकारच्या काळात उघड झालेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर कोणतीही कारवाई न केल्याचा आरोप केला. तसेच, 11 एप्रिल रोजी एक दिवसाची उपोषण करण्याची घोषणाही केली आहे.

कशामुळे वाद पेटला?पायलट म्हणाले की, केंद्र सरकार ईडी आणि सीबीआयसारख्या एजन्सीचा गैरवापर करत आहे आणि आमच्या काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली जात आहे, परंतु राजस्थानमध्ये आमचे सरकार एजन्सीचा कोणताही वापर करत नाही. राजस्थानमध्ये 2018 च्या निवडणुकीपूर्वी भाजप सरकारमध्ये भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली होती, परंतु आमचे सरकार सत्तेत आल्यानंतरही कोणतीही कारवाई झाली नाही. यावरुन लोक वसुंधरा राजे आणि गेहलोत यांच्यात काही मिलीभगत असल्याचे म्हणू शकतात, असे पालयट म्हणाले.

'माझ्या दोन पत्रांची उत्तरं मिळाली नाही'पायलट पुढे म्हणाले की, 2013 मध्ये काँग्रेसचे सरकार होते, पण निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर मी प्रदेशाध्यक्ष झालो, 5 वर्षे वसुंधरा सरकारचा विरोध केला आणि 2018 मध्ये त्यांचा पराभव केला. आम्ही जनतेला विश्वास दिला होता की, वसुंधरा सरकारमधील भ्रष्टाचाराची आम्ही चौकशी करुन दोषींना शिक्षा देऊ, परंतु असे काहीही झाले नाही. मी वसुंधरा सरकारच्या प्रकरणांवर सीएम गेहलोत यांना दोन पत्रे लिहिली होती, ज्यामध्ये मी त्यांना आरोपांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. पण गेहलोत यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. 

'गेहलोत यांच्या जुन्या भाषणाचा व्हिडिओ दाखवला'यावेळी पायलट यांनी अशोक गेहलोत यांच्या जुन्या पत्रकार परिषदेचे व्हिडिओ देखील दाखवले, ज्यामध्ये मुख्यमंत्री स्वतः वसुंधरा सरकारच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा उल्लेख करत आहेत. निवडणुकीच्या वेळी खुद्द मुख्यमंत्र्यांनीच खान महाघोटाळा, कोळसा घोटाळा यासारख्या अनेक घोटाळ्यांचे आरोप भाजप सरकारवर केले होते आणि काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यास या प्रकरणाची चौकशी करू असे सांगितले होते. बेकायदेशीर उत्खनन, खडी माफिया, दारू माफिया या प्रकरणी अद्यापपर्यंत तपास झाला नसून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे पायलट यांनी सांगितले. 

'पायलटचे सरकारविरोधात उपोषण'पायलट पुढे म्हणाले की, मी आमच्या सरकारवर आरोप करत नाही, मला फक्त या गोष्टी सार्वजनिक करायच्या होत्या. मी हा मुद्दा आज मांडत नाही, पण सरकारला साडेतीन वर्षे पूर्ण झाल्यानंतरच मी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून ही मागणी करायला सुरुवात केली आणि आज काँग्रेस कार्यकर्त्यांना आणि सर्वसामान्यांना हे कळावे अशी माझी इच्छा आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलट