शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

हा भारताचा अपमान, सरकारने यावर..; चीनच्या 'त्या' दाव्यावर असदुद्दीन ओवेसी स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2026 16:27 IST

Asaduddin Owaisi: भारत-पाकिस्तान संघर्षात आपण मध्यस्थी केल्याचा दावा चीनने केला आहे.

Asaduddin Owaisi: भारत-पाकिस्तान दरम्यान झालेल्या युद्धविराम (सीजफायर) प्रक्रियेत चीनने मध्यस्थी केल्याच्या दाव्यावर राजकीय वाद पेटला आहे. या मुद्द्यावर आता एआयएमआयएम पक्षाचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी तीव्र प्रतिक्रिया देत मोदी सरकारला जाहीरपणे चीनचा दावा फेटाळण्याची मागणी केली आहे. ओवेसींनी यांनी हा दावा भारताच्या सार्वभौमत्वाचा अपमान असल्याचे म्हटले आहे.

भारत गप्प बसू शकत नाही- ओवेसी

ओवेसी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर सलग पोस्ट करत चीनच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष सीजफायरबाबत दावे करत असतानाच आता चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनीही भारत-पाक संघर्षात मध्यस्थी केल्याचा दावा केला आहे. हा थेट भारताचा अपमान आहे. भारत सरकारने यावर कठोर आणि स्पष्ट उत्तर दिले पाहिजे. चीनसोबत संबंध सुधारण्याच्या नावाखाली भारताचा सन्मान आणि सार्वभौमत्व धोक्यात घालता येणार नाही.

भारत-पाकला एकाच पातळीवर ठेवण्याचा प्रयत्न

एकीकडे चीन पाकिस्तानला 81% शस्त्रे पुरवतो आणि 'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान रिअल-टाइम गुप्त माहिती देतो, आणि दुसरीकडे तो मध्यस्थ असल्याची बतावणी करतो. हे अस्वीकार्य आहे आणि एक देश म्हणून आपण हे शांतपणे सहन करू शकत नाही. चीन भारत आणि पाकिस्तानला एकाच स्तरावर ठेवू इच्छितो आणि स्वतःला दक्षिण आशियातील वर्चस्वशाली शक्ती म्हणून सादर करू पाहतो. पंतप्रधान चीन दौऱ्यावर गेले होते, तेव्हा सरकारने अशा भूमिकेला संमती दिली होती का? असा सवालही ओवेसींनी यावेळी विचारला.

केंद्र सरकारकडून चीनच्या दाव्याचे खंडन

दरम्यान, बुधवारी (31 डिसेंबर 2025) केंद्र सरकारने चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दाव्यांचे अधिकृतपणे खंडन केले. सरकारी सूत्रांनी स्पष्ट केले की, भारत-पाक संघर्षात कोणत्याही तिसऱ्या देशाच्या मध्यस्थीला भारताचा ठाम विरोध आहे आणि या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या अशाच दाव्यांनाही भारताने फेटाळले होते.

चिनी परराष्ट्र मंत्र्यांचा दावा काय होता?

चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी एका भाषणात दावा केला होता की, दीर्घकालीन शांततेसाठी चीनने निष्पक्ष आणि न्याय्य भूमिका घेतली. संघर्षाची लक्षणे आणि मूळ कारणे दोन्ही दूर करण्यावर आमचा भर होता. याच भूमिकेमुळे चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Owaisi slams China's mediation claim in India-Pakistan conflict, demands government rebuttal.

Web Summary : Owaisi criticizes China's claim of mediating between India and Pakistan, calling it an affront to India's sovereignty. He urges the government to strongly refute China's assertion and questions if India compromised its position during the Prime Minister's visit.
टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीन