शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Incident: “PM मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही, अतीक असता तर घरावर बुल्डोजर फिरवला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:01 IST

Lakhimpur Kheri Incident वरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत.

बलरामपूर:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या हिंसाचारावरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलाला अटक करण्यात आली असली, तरी विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली असून, आशिष मिश्राचे अब्बाजानला हटवणार नाहीत, असे म्हटले आहे. 

आशिष मिश्राच्या जागी कुणीतरी अतीक असता तर आतापर्यंत त्याच्या घरावरून बुल्डोजर फिरवला असता, असा दावा करत भाजपने कमळ हे चिन्ह बदलून थार जीप ठेवावे, अशी टीका केली आहे. लखीमपूर खेरी घटनेत गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. 

आशिषच्या अब्बाजानविरोधात कारवाई नाही?

पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही का? योगी आदित्यनाथ कारवाई करणार नाहीत का? उच्च जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीए. आशिषच्या ऐवजी अतीक असता तर आतापर्यंत घरावर बुल्डोजर फिरवला गेला असता. योगी बाबाच्या बुल्डोजरवर लिहिलेय की, केवळ मुसलमानांची घरे तोडली जावीत, अशी खरमरीत टीका ओवेसी यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशात २७ टक्के मुस्लीम अंडर ट्रायल

उत्तर प्रदेशमधील २७ टक्के मुस्लिमांवर अंडर ट्रायल सुरु आहे. येथील १९ टक्के मुस्लिमांची इच्छा आहे की, त्यांचा कुणीतरी नेता हवा. मात्र, मुस्लिमांचा कुणीही नेता नाही. लखीमपूर येथे जे काही झाले, ते आदेशांशिवाय शक्य नाही. ही अचानक घडलेली घटना नाही. यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती, असा दावाही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश