शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Election 2026: "राज ठाकरेंची भाषणं भारी, पण कामाच्या नावानं पाटी कोरी" असं कुणी म्हटलं? 
2
भाईंदरमध्ये आचार संहितेचा भंग, आठ दिवसानंतर गुन्हा दाखल, लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट!
3
Pakistan Accident: पाकिस्तानमध्ये भीषण अपघात; खेळाडूंना घेऊन जाणाऱ्या बसची व्हॅनला धडक, १५ जणांचा मृत्यू
4
'लोकपाल'साठी आता ५ कोटी रुपयांच्या बीएमडब्ल्यू कार खरेदी केल्या जाणार नाहीत; निविदा केल्या रद्द
5
Nagpur: सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणाऱ्यांना महापालिकेचा दणका; एकाच दिवसात ४४ जणांवर कारवाई!
6
Google: नव्या वर्षात गुगल पिक्सेल १० खरेदी करा आणखी स्वस्तात; फ्लिपकार्टची जबरदस्त ऑफर्स!
7
"उत्तर भारतीयांना मारहाण करणाऱ्यांना अटक करा, नाहीतर..."; शिंदेसेनेचे नेते संजय निरुपमांचा इशारा
8
Nagpur: पूर्व नागपुरात ‘तूतू-मैमै’, खोपडे पिता-पुत्र आमदार वंजारींवर बरसले
9
इराणमध्ये लोक रस्त्यावर उतरले, सुरक्षा जवानांसोबत झटापट; काही जण दगावले, नेमकं काय घडले?
10
दुर्गापूजा, जन्माष्टमी, सरस्वती पूजन... सगळ्या सुट्या रद्द ! बांग्लादेशमध्ये हिंदूंवर आघात
11
Switzerland Blast: स्वित्झर्लंडमधील बारमधील स्फोट, दहशतवादी हल्ला की आणखी काही? पोलिसांनी केला मोठा खुलासा; आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू
12
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील सिद्धीविनायकाचे घेतले दर्शन, पाहा फोटो
13
रोहित–विराटच्या निवृत्तीनंतर वनडे क्रिकेटच संपणार? अश्विन म्हणाला, FIFA फॉर्म्युलाच ठरेल 'तारणहार'
14
विरोधकांचे अर्ज ठरवून बाद करायचे आणि महायुतीचे बिनविरोध विजयी करायचे हे षडयंत्र, मनसेचा आरोप
15
Viral Video: स्टेडियमला पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंवर आली टॅक्सीला धक्का मारण्याची वेळ
16
Jammu and Kashmir Champions League: भारतीय क्रिकेटपटूच्या हेल्मेटवर पॅलेस्टिनी ध्वज, पोलिसांनी चौकशीसाठी बोलावलं, कोण आहे तो?
17
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदू व्यक्तीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न, पेट्रोल टाकून केला हल्ला
18
तेजस्वी घोसाळकरांविरोधात मैत्रीणच रिंगणात! उद्धव ठाकरेंनी 'या' महिलेला दिली उमेदवारी 
19
Ahilyanagar: मनसेच्या दोन उमेदवारांचे अपहरण? पक्षाची कोतवाली पोलीस ठाण्यात धाव!
20
सावधान! फास्ट फूड बेतलं जीवावर; बर्गर, नूडल्स खाणाऱ्या विद्यार्थिनीचा मेंदूत २० गाठी झाल्याने मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

Lakhimpur Kheri Incident: “PM मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही, अतीक असता तर घरावर बुल्डोजर फिरवला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:01 IST

Lakhimpur Kheri Incident वरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत.

बलरामपूर:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या हिंसाचारावरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलाला अटक करण्यात आली असली, तरी विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली असून, आशिष मिश्राचे अब्बाजानला हटवणार नाहीत, असे म्हटले आहे. 

आशिष मिश्राच्या जागी कुणीतरी अतीक असता तर आतापर्यंत त्याच्या घरावरून बुल्डोजर फिरवला असता, असा दावा करत भाजपने कमळ हे चिन्ह बदलून थार जीप ठेवावे, अशी टीका केली आहे. लखीमपूर खेरी घटनेत गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. 

आशिषच्या अब्बाजानविरोधात कारवाई नाही?

पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही का? योगी आदित्यनाथ कारवाई करणार नाहीत का? उच्च जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीए. आशिषच्या ऐवजी अतीक असता तर आतापर्यंत घरावर बुल्डोजर फिरवला गेला असता. योगी बाबाच्या बुल्डोजरवर लिहिलेय की, केवळ मुसलमानांची घरे तोडली जावीत, अशी खरमरीत टीका ओवेसी यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशात २७ टक्के मुस्लीम अंडर ट्रायल

उत्तर प्रदेशमधील २७ टक्के मुस्लिमांवर अंडर ट्रायल सुरु आहे. येथील १९ टक्के मुस्लिमांची इच्छा आहे की, त्यांचा कुणीतरी नेता हवा. मात्र, मुस्लिमांचा कुणीही नेता नाही. लखीमपूर येथे जे काही झाले, ते आदेशांशिवाय शक्य नाही. ही अचानक घडलेली घटना नाही. यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती, असा दावाही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश