शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

Lakhimpur Kheri Incident: “PM मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही, अतीक असता तर घरावर बुल्डोजर फिरवला असता”

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2021 09:01 IST

Lakhimpur Kheri Incident वरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत.

बलरामपूर:उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri Incident) येथील घटनेवरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. या हिंसाचारावरून विरोधक केंद्रातील मोदी आणि युपीतील योगी सरकारवर निशाणा साधत आहेत. गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलाला अटक करण्यात आली असली, तरी विरोधक आक्रमक असल्याचे पाहायला मिळत आहेत. यातच एमआयएम नेते असदुद्दीन ओवेसी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार टीका केली असून, आशिष मिश्राचे अब्बाजानला हटवणार नाहीत, असे म्हटले आहे. 

आशिष मिश्राच्या जागी कुणीतरी अतीक असता तर आतापर्यंत त्याच्या घरावरून बुल्डोजर फिरवला असता, असा दावा करत भाजपने कमळ हे चिन्ह बदलून थार जीप ठेवावे, अशी टीका केली आहे. लखीमपूर खेरी घटनेत गृहराज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांचा मुलगा आशिष मिश्रा मुख्य आरोपी आहे. 

आशिषच्या अब्बाजानविरोधात कारवाई नाही?

पंतप्रधान मोदी आशिषच्या अब्बाजानला हटवणार नाही का? योगी आदित्यनाथ कारवाई करणार नाहीत का? उच्च जातीचे असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई केली जात नाहीए. आशिषच्या ऐवजी अतीक असता तर आतापर्यंत घरावर बुल्डोजर फिरवला गेला असता. योगी बाबाच्या बुल्डोजरवर लिहिलेय की, केवळ मुसलमानांची घरे तोडली जावीत, अशी खरमरीत टीका ओवेसी यांनी केली आहे. 

उत्तर प्रदेशात २७ टक्के मुस्लीम अंडर ट्रायल

उत्तर प्रदेशमधील २७ टक्के मुस्लिमांवर अंडर ट्रायल सुरु आहे. येथील १९ टक्के मुस्लिमांची इच्छा आहे की, त्यांचा कुणीतरी नेता हवा. मात्र, मुस्लिमांचा कुणीही नेता नाही. लखीमपूर येथे जे काही झाले, ते आदेशांशिवाय शक्य नाही. ही अचानक घडलेली घटना नाही. यासाठी पूर्ण तयारी करण्यात आली होती, असा दावाही ओवेसी यांनी केला. 

दरम्यान, लखीमपूर हिंसाचारात चार शेतकऱ्यांसह एकूण आठ जणांचा मृत्यू झाला असून, यामध्ये भाजप कार्यकर्ते, एक चालक आणि एका पत्रकाराचा समावेश आहे. या घटनेनंतर आतापर्यंत योगी सरकारने एकालाही अटक केलेली नाही. यावरून विरोधकांनी गृह राज्यमंत्री अजय मिश्रा टेनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, शेतकरी नेत्यांनी देशव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. दुसरीकडे, लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्या शेतकऱ्यांना ४५ लाख आणि जखमींना १० लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. 

टॅग्स :Lakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचारAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीBJPभाजपाUttar Pradeshउत्तर प्रदेश