शहरं
Join us  
Trending Stories
1
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
2
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
3
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तीन टप्प्यांत? जाणून घ्या सविस्तर
4
एकनाथ शिंदेंवरील टीकेला प्रत्युत्तर देणार; खा. नरेश म्हस्के यांचा मंत्री नाईकांना अप्रत्यक्ष इशारा
5
परवाना मिळण्याआधीच मोडले नियम; ई-बाईकऐवजी चक्क पेट्रोलवरील गाडी हजर
6
रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने
7
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
8
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
9
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
10
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
11
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
12
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
13
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
14
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
15
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
16
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
17
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
18
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
19
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
20
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय

"शेतकऱ्यांच्या मागण्या योग्यच, त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं"; केजरीवाल सरकारचा पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:47 IST

Farmers Protest And Arvind Kejriwal : पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

पंजाब-हरियाणातून दिल्लीच्या दिशेने निघालेल्या शेतकऱ्यांना अरविंद केजरीवाल सरकारने पाठिंबा दिला आहे. दिल्लीत आंदोलन करण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांबाबत केजरीवाल सरकार म्हणालं की, शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना जेलमध्ये टाकणं चुकीचं आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे दिल्ली सरकारने बवाना स्टेडियमला ​​तात्पुरतं जेल बनवण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव फेटाळून लावला. 

पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशातील शेतकरी आज 'दिल्ली चलो' मोर्चा काढण्यासाठी तयार आहेत. या पार्श्वभूमीवर सीमेवर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे. दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आले आहे. शेतकरी आंदोलनावर दिल्लीचे केजरीवाल सरकार म्हणालं की, "शेतकऱ्यांच्या मागण्या योग्य आहेत आणि प्रत्येक नागरिकाला संविधानानुसार शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे."

"शेतकरी हे या देशाचे अन्नदाता असून अन्नदात्याला जेलमध्ये टाकणं चुकीचं आहे. बवाना स्टेडियमला ​​जेल बनवण्यास परवानगी देता येणार नाही." शेजारील राज्यातील शेतकरी देशाची राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर-ट्रॉली घेऊन दिल्लीत पोहोचत आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दिल्लीला लागून असलेल्या अनेक सीमा सील करण्यात आल्या आहेत. मंगळवार, 13 फेब्रुवारीपासून अनेक राज्यांतील शेतकऱ्यांनी ‘दिल्ली चलो’ मोर्चा सुरू केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालdelhiदिल्लीFarmers Protestशेतकरी आंदोलनFarmerशेतकरी