शहरं
Join us  
Trending Stories
1
"घरात एवढा मोठा व्यवहार होतो अन्..."; पार्थ पवारांच्या जमीन व्यवहारावरून वडेट्टीवार यांचा अजित पवारांना थेट सवाल
2
“मुलाचे ३०० कोटींचे व्यवहार पित्याला ज्ञात नाही, तुमचे तुम्हाला पटते का”; कुणी केली टीका?
3
बिहारमध्ये जेव्हा जेव्हा ५ टक्के मतदान वाढले, तेव्हा सरकार पडले; काल ८.५ टक्के मतदान वाढ कशाचे संकेत?
4
पार्थ पवार जमीन घोटाळा, अण्णा हजारेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “कुटुंबाचे संस्कार...”
5
Stock Market Today: शेअर बाजार जोरदार आपटला, सेन्सेक्स ४५० अंकांनी घसरला; निफ्टीही २५,४०० च्या खाली
6
Astro Tips: शुक्रवारी लक्ष्मी उपासनेसाठी तुम्ही कापराचे 'हे' उपाय करता का? मिळते धन-समृद्धी!
7
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
8
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
9
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
10
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
11
भाजपाला मतदान केल्याने दलितांना मारहाण, आरजेडीवर आरोप, बिहारमधील गोपालगंज येथील घटना  
12
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
13
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
14
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
15
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
16
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
17
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
18
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
19
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
20
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी

केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:51 IST

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची अलीकडेच जामीनावर सुटका करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ते अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रातील BJP सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा 'आप' पक्ष फोडण्याचा कट फसला, आमचे नेते एकजुटीने उभे आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे कारणही सांगितले.

उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?मनीष सिसोदिया यांनी हिंदी वृत्तवाहिनी टीव्ही 9 शी संवाद साधताना म्हटले की, 'मला राजीनामा दिल्याचा पश्चाताप नाही. मी राजकारणात खूप नंतर आलो. सुरुवातीला मी माझ्या पत्रकारितेच्या काळात रस्त्यावर उतरलो. माहितीच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राजकारणात आलो. राजकारणात आल्याचाही मला पश्चाताप नाही. जनतेच्या आशीर्वादानेच मला काही घटनात्मक पदे भूषवण्याची संधी मिळाली.'

राजीनाम्याच्या प्रश्नावर सिसोदिया म्हणाले की, 'एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार पडत नाही, त्याच्या जागी त्याचे काम दुसऱ्याला देता येते. पण, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर सरकार पडते, सरकार बदलते. मी राजीनामा देणे आणि अरविंद केजरीवालांनी राजीनामा देणे, यात मोठा फरक आहे. माझ्या अटकेनंतर केजरीवालांनी शिक्षण क्षेत्रातील काम पुढे आतिशी यांना जबाबदारी दिली. अरविंद केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे, कुठेतरी सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.'

निवडणुकीपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे षडयंत्र सिसोदिया पुढे म्हणतात, 'ड्रग्ज माफियांविरोधात जे गुन्हे दाखल होता, ते गुन्हे माझ्यावर दाखल केले. माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. दिल्ली निवडणुकीपर्यंत मला तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे सरकार पाडायचे असेल, तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर पीएमएलए कलम लादून सरकार पाडा, ही अत्यंत वाईट परंपरा होत चालली आहे,'  अशी टीकाही सिसोदियांनी यावेळी केली. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीjailतुरुंगBJPभाजपा