शहरं
Join us  
Trending Stories
1
नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
2
बांगलादेशात आंदोलकांना मोठा धक्का! सेव्हन सिस्टर्सच्या मास्टरमाईंडनेच साथ सोडली, विद्यार्थी नेते सत्तेसाठी हपापले...
3
तुम्ही तुमचा स्मार्टफोन कसा ठेवता? उलटा की सुलटा... ९९ टक्के भारतीय अनभिज्ञ...
4
हात-पाय बांधले, हत्या केली अन् चेहरा जाळला; नोएडातील डंपिंग ग्राऊंडवर तरुणीचा छिन्नविच्छिन्न देह सापडला!
5
मुस्लिम कार्यकर्त्याचं स्वागत करणं ब्रिटीश पंतप्रधानांना पडलं महागात; कीर स्टार्मर यांच्यावर चहुबाजूंनी टीकेची झोड!
6
काँग्रेस-‘वंचित’ची आघाडी, पण वर्षा गायकवाड कुठे दिसल्या नाहीत; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
7
‘वंचित’ला ठाकरेंची साथ, भाजपा वगळून शिंदे-अजितदादा एकत्र; राज्यात युती, आघाडीचे काय चित्र?
8
‘ते मरावेत’, असं झेलेन्स्की यांना का वाटतं?
9
भीषण काळरात्र! टाटा नगर-एर्नाकुलम एक्स्प्रेसमध्ये आग; एकाचा होरपळून मृत्यू, दोन डबे खाक!
10
खिशाला लागणार कात्री! नवीन वर्ष २०२६ मध्ये चांदी ₹३ लाख आणि सोनं ₹१.६० लाखांच्या पार जाणार?
11
आजचा दिवस रेल्वे अपघातांचा! जेव्हा टाटानगर एक्स्प्रेस जळत होती, तेव्हा जगाच्या या कोपऱ्यात ट्रेन घसरली, १३ जणांचा मृत्यू
12
'ऑपरेशन सिंदूर' वेळी भारताला समजावण्यासाठी हे दोन देश आले होते, युद्धविरामवर पाकिस्तानचा दावा
13
शिवसेनेत प्रवेश करताच प्रकाश महाजन यांच्यावर मोठी जबाबदारी; DCM एकनाथ शिंदेंनी दिले आदेश
14
भारतासाठी इशाऱ्याची घंटा; बांगलादेश हा केवळ शेजारी देश नाही, तर... 
15
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२१,३४१ चं फिक्स व्याज, गॅरंटीसह मिळणार परतावा
16
Video : हवेत टक्कर अन् काही सेकंदात जमिनीवर कोसळले हेलिकॉप्टर! अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद
17
१ महिन्यात ३ चतुर्थींचा अद्भूत योग; २०२६ मध्ये किती अन् कधी विनायक-संकष्टी तिथी? यादीच पाहा
18
चांदी जैसा रंग है तेरा...! 'ही' छैल छबेली चांदी फक्त भाव खात चालली आहे...
19
"युक्रेन शांतता चर्चा ९५% यशस्वी, पण..." झेलेन्स्की-ट्रम्प यांच्यात काय चर्चा झाली? हा महत्वाचा मुद्दा अद्यापही लटकूनच
20
आजचे राशीभविष्य २९ डिसेंबर २०२५ : या राशीला आज लॉटरी लागणार, शेअर्समध्ये पण...
Daily Top 2Weekly Top 5

केजरीवालांनी राजीनामा दिला नाही, मग तुम्ही का दिला? मनीष सिसोदियांनी सांगिले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 16:51 IST

तुरुंगातून बाहेर आल्यानंतर दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सातत्याने केंद्र सरकारवर टीका करत आहेत.

नवी दिल्ली : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांची अलीकडेच जामीनावर सुटका करण्यात आली. दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ते अनेक महिन्यांपासून तिहार तुरुंगात कैद होते. दरम्यान, तुरुंगातून बाहेर आल्यानंतर त्यांनी केंद्रातील BJP सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. भाजपचा 'आप' पक्ष फोडण्याचा कट फसला, आमचे नेते एकजुटीने उभे आहेत,' अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. तसेच, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचे कारणही सांगितले.

उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा का दिला?मनीष सिसोदिया यांनी हिंदी वृत्तवाहिनी टीव्ही 9 शी संवाद साधताना म्हटले की, 'मला राजीनामा दिल्याचा पश्चाताप नाही. मी राजकारणात खूप नंतर आलो. सुरुवातीला मी माझ्या पत्रकारितेच्या काळात रस्त्यावर उतरलो. माहितीच्या अधिकारासाठी रस्त्यावर उतरले आणि त्यानंतर राजकारणात आलो. राजकारणात आल्याचाही मला पश्चाताप नाही. जनतेच्या आशीर्वादानेच मला काही घटनात्मक पदे भूषवण्याची संधी मिळाली.'

राजीनाम्याच्या प्रश्नावर सिसोदिया म्हणाले की, 'एखाद्या मंत्र्याच्या राजीनाम्यामुळे सरकार पडत नाही, त्याच्या जागी त्याचे काम दुसऱ्याला देता येते. पण, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला, तर सरकार पडते, सरकार बदलते. मी राजीनामा देणे आणि अरविंद केजरीवालांनी राजीनामा देणे, यात मोठा फरक आहे. माझ्या अटकेनंतर केजरीवालांनी शिक्षण क्षेत्रातील काम पुढे आतिशी यांना जबाबदारी दिली. अरविंद केजरीवाल यांना अटक करणे म्हणजे, कुठेतरी सरकार पाडण्याचे षडयंत्र रचले जात आहे.'

निवडणुकीपर्यंत तुरुंगात ठेवण्याचे षडयंत्र सिसोदिया पुढे म्हणतात, 'ड्रग्ज माफियांविरोधात जे गुन्हे दाखल होता, ते गुन्हे माझ्यावर दाखल केले. माझ्या विरोधात मोठे षडयंत्र रचले गेले. दिल्ली निवडणुकीपर्यंत मला तुरुंगात ठेवण्याचा प्रयत्न झाला. विरोधी पक्षाचे सरकार पाडायचे असेल, तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांवर पीएमएलए कलम लादून सरकार पाडा, ही अत्यंत वाईट परंपरा होत चालली आहे,'  अशी टीकाही सिसोदियांनी यावेळी केली. 

टॅग्स :Manish Sisodiaमनीष सिसोदियाArvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपdelhiदिल्लीjailतुरुंगBJPभाजपा