शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

Arvind Kejriwal : "भाजपाने वाटण्यासाठी १० हजार दिले, त्यांच्या नेत्यांनी ९ हजार खाल्ले अन्...", केजरीवालांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2025 13:48 IST

Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मंगळवारी (१४ जानेवारी) सांगितलं की, दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपा उघडपणे पैसे वाटत आहे. यामुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.

केजरीवाल म्हणाले, त्यांच्या पक्षाने (भाजपा) प्रत्येकी १०,००० रुपये पाठवले, पण त्यांच्या नेत्यांना वाटतं की, ते जिंकणार नाहीत, म्हणून ते पैसे कमावताहेत. त्यांच्या नेत्यांनी प्रत्येकी ९,००० रुपये स्वत:कडे ठेवले आणि प्रत्येकी १,००० रुपये वाटले. तेही सर्वांना दिले गेले नाही. लोकांना याबद्दल आता माहिती होत असल्याने त्यांच्यात संतापाचं वातावरण आहे. 

पत्रकार परिषदेत दावा केला की, त्यांच्या नेत्यांनी जनतेच्या नावावर आलेले पैसे खाऊन टाकले आहेत. त्यांचे नेते जिथे जिथे जात आहेत तिथे जनता त्यांना पैसे जपून ठेवण्यास सांगत आहे. त्यांच्या लोकांनी काही ठिकाणी ब्लँकेट वाटले आणि इतर ठिकाणी वाटले नाहीत, याबद्दलही लोक संतापले आहेत. लोक विचारत आहेत की आमचे ब्लँकेट, साड्या, बूट आणि जॅकेट कुठे गेले? त्यांनी काही कॉलनीमध्ये सोन्याच्या चेनचं वाटपही केलं.

अरविंद केजरीवाल म्हणाले, "हे लोक म्हणत आहेत की, आम्ही मतं खरेदी करू. मी लोकांना आवाहन करतो की, जे काही मिळेल ते घ्या, भांडून भांडून घ्या. त्यांच्या ऑफिसमध्ये जा आणि ते घ्या, पण तुमचं मत विकलं जाऊ देऊ नका. आपलं मत मौल्यवान आहे, हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे."

"मी असं म्हणत नाही की, तुम्ही आपला मतदान करा, पण जे पैसे वाटत आहेत त्यांना देऊ नका. हे गद्दार आहेत. त्यांना देश विकत घ्यायचा आहे, ते अहंकारी आहेत. त्यांचे पैसे वाया घालवा. दिल्लीतील लोकांना विकत घेता येत नाही हे सिद्ध करा. यावेळी या गुंडांना सांगा की दिल्लीचे लोक विकले जात नाहीत." 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपPoliticsराजकारण