शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

"आम्ही तुमच्यासारख्या बोगस कोरोना चाचण्या करत नाही", केजरीवालांचा योगींना सणसणीत टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2020 11:03 IST

Delhi Arvind Kejriwal And Uttar Pradesh Yogi Adityanath : अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे.

नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत असून रुग्णांची संख्या तब्बल 99,56,558 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच राज्यांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोना चाचण्यांचे प्रमाण हे वाढवण्यात आले आहेत. याच दरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कोरोना चाचण्यांवरून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना सणसणीत टोला लगावला आहे. अरविंद केजरीवाल यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट करत निशाणा साधला आहे. 

"योगी आदित्यनाथ यांना जागे असताना, झोपताना, उठताना, बसताना फक्त दिल्ली सरकार आणि आम आदमी पार्टीचं दिसते" असं केजरीवाल यांनी म्हटलं आहे. तसेच "कोरोनासंदर्भातील आमच्या शानदार कामाची चर्चा ही उत्तर प्रदेशमध्ये होते. आम्ही तुमच्यासारख्या बोगस करोना चाचण्या करत नाही" असं देखील केजरीवालांनी म्हटलं आहे. याआधी योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीच्या तुलनेत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाने होणारे मृत्यू कमी आहेत. कोरोना संसर्गाची साखळी प्रत्येत पातळीवर तोडण्याचा प्रयत्न सरकारकडून होत आहे असं म्हटलं होतं. त्यावर आता केजरीवालांनी निशाणा साधला आहे.

योगी आदित्यनाथ यांनी दिल्लीशी तुलना करत सरकारची कामगिरी मांडली आहे. उत्तर प्रदेशची लोकसंख्या 24 कोटी आहे आणि 10 महिन्यांत 8 हजार नागरिकांचा कोरोनाने मृत्यू झाला अशी माहिती योगी आदित्यनाथ यांनी दिली. दिल्लीची लोकसंख्या पावणेदोन कोटी असून करोनाने 10 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही यूपीच्या कोविड व्यवस्थापनाचे कौतुक केले आहे. यूपीतील कोविड व्यवस्थापन ज्यांना दिसत नाही, त्यांनी सार्वजनिक स्थळावरून माहिती घ्यावी. पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनामुळे आणि सर्वसामान्यांच्या पाठिंब्याने हे सर्व शक्य झाल्याचं योगी आदित्यनाथ म्हटलं आहे.

"2 कोटी लोकसंख्येचं दिल्ली सांभाळलं जात नाही अन् 24 कोटी लोकसंख्येच्या उत्तर प्रदेशचं स्वप्न पाहताहेत"

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. मंगळवारी यासंदर्भात त्यांनी घोषणा केली. उत्तर प्रदेशात 2022 मध्ये विधानसभेसाठी निवडणुका होणार आहेत. जनआंदोलनच्या माध्यमातून गेल्या 8 वर्षांपूर्वी पार्टीची स्थापना करण्यात आली होती. तीन वेळा दिल्लीत सरकार स्थापन करण्यास पार्टीला यश मिळाले. याशिवाय, पंजाबमध्ये आपल्या पार्टीने मुख्य विरोधी पक्षाचीही भूमिका बजावली आहे असं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

आपच्या उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका लढण्याचा निर्णयावर भाजपाने जोरदार निशाणा साधला आहे. "दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही" असं म्हणत भाजपाने अरविंद केजरीवाल आणि "आप"ला सणसणीत टोला लगावला आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "दोन कोटी लोकसंख्या असलेली दिल्ली सांभाळली जात नाही. तर दुसरीकडे 24 कोटी लोकसंख्या असलेलं उत्तर प्रदेश सांभाळण्याच्या गोष्टी सुरू आहेत. ही गोष्ट करणारा पक्ष सुंदर स्वप्नच पाहत आहे" अशा शब्दांत केशव प्रसाद मौर्य यांनी हल्लाबोल केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआपyogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशcorona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीBJPभाजपा