शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
3
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
4
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
5
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
6
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
7
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
8
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
9
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
10
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
11
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
12
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
13
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
14
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
15
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
16
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
17
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
18
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
19
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
20
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य

Arvind Kejariwal: देशासाठी जीव देण्याचीही तयारी, हल्ल्यानंतर केजरीवालांचा भाजपवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 5:00 PM

भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे.

नवी दिल्ली - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानावर बुधवारी दुपारी भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला, असा आरोप आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी केला आहे. ‘काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या विरोधात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध हे कार्यकर्ते करीत होते. या हल्ल्यानंतर आपच्या नेत्यांनी भाजववर शरसंधान साधले आहे. आता, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही याबाबत आपलं मत मांडलं आहे. देशासाठी जीव देण्यासही मी तयार असल्याचे त्यांनी म्हटले. 

''भाजपकडून गुंडागर्दीचं उपद्रवी राजकारण होत असून या कृत्यातून देशाला चुकीचा संदेश दिला जात आहे. अरविंद केजरीवाल नाही, तर देश महत्त्वाचा आहे. मी देशासाठी माझा जीवही देऊ शकतो. मात्र, या उपद्रवामुळे भारताची प्रगती होणार नाही,'' असे केजरीवाल यांनी म्हटले.  काही दिवसांपूर्वी केजरीवाल यांनी द काश्मीर फाईल्स या चित्रपटाबद्दल बोलताना खोट्या माहितीच्या आधारावर चित्रीकरण केल्याचा आरोप केला. याच्या निषेध करण्यासाठी दिल्ली भाजपचे प्रवक्ता तेजिंदरपाल बग्गा यांच्या नेतृत्वात निवासस्थानासमोर अकरा वाजता १५०-२०० कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन घोषणा दिल्या. कार्यकर्त्यांनी घरासमोरील सीसीटीव्ही कॅमेरे व बॅरिकेट्स तोडले. या कार्यकर्त्यांना पोलिसांनी हुसकावून लावले. त्यानंतर,  पंजाबमध्ये झालेल्या पराभवामुळे भाजपने मुख्यमंत्र्यांच्या घरावर हल्ला केल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. 

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया म्हणाले

मनीष सिसोदिया म्हणाले की, "भाजप अरविंद केजरीवाल यांना निवडणुकीत पराभूत करू शकत नाही. त्यामुळे भाजपला त्यांना मारायचे आहे. हा अतिशय विचारपूर्वक केलेला कट आहे. मी भाजपला सांगू इच्छितो की, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना हात लावण्याचा प्रयत्न करू नका. अशाप्रकारे हल्ले करून त्यांना मारण्याचा प्रयत्न करू, हे देश खपवून घेणार नाही."

भगवंत मान यांनीही केला भाजपवर हल्लाबोल

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल (Chief Minister Arvind Kejriwal)यांच्या घरावरील हल्ला हे भ्याड कृत्य असल्याचे म्हटले आहे. त्यांनी ट्विट करून म्हटले की, पंजाबमध्ये आम आदमी पार्टीकडून झालेल्या दारूण पराभवामुळे भाजपचा राग स्पष्टपणे दिसत आहे. अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला दिल्ली पोलिसांच्या उपस्थितीत झाल्याचा आरोपही भगवंत मान यांनी केला आहे. ते म्हणाले, आता स्पष्ट झाले आहे की भाजप फक्त आप आणि अरविंद केजरीवाल यांना घाबरत आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालBJPभाजपाAAPआपThe Kashmir Filesद काश्मीर फाइल्स