शहरं
Join us  
Trending Stories
1
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
2
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
3
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
4
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
5
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
7
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...
8
राहुल गांधींचे आव्हान भाजपने स्वीकारले; खुल्या चर्चेसाठी 'या' नेत्याची केली निवड...
9
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
10
RR ला मोठा धक्का; स्टार खेळाडूची IPL 2024 मधून माघार, Play Off ची जागा पक्की होण्यापूर्वी झटका
11
निवडणूक लढवण्यासाठी रायबरेलीचीच निवड का केली? राहुल गांधींनी भरसभेत कारण सांगून टाकले...
12
Video: भीषण! मुंबईत पेट्रोल पंपावर भलंमोठं लोखंडी होर्डिंग कोसळलं, लोक अडकले; पार्किंग टॉवरही जमीनदोस्त 
13
हार्दिक पांड्याला उप कर्णधारपद BCCI अधिकाऱ्याच्या दबावामुळे मिळालं?
14
Dust Storm: मुंबईत वादळ वारं सुटलंय... विमानतळाचा रनवे बंद; पावसाला सुरुवात, मेट्रो-१ सेवा ठप्प
15
मुंबई दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार, रेवण्णा प्रकरणी घेतलेल्या भूमिकेचा निषेध करणार
16
शिल्पा शेट्टी कुटुंबासोबत वैष्णोदेवीच्या दर्शनाला, व्हिडिओमधील 'ती' गोष्ट पाहून भडकले नेटकरी
17
ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबईत आधी धुळीचं वादळ; मग धो-धो पाऊस
18
T20 WC च्या तयारीसाठी इंग्लंडचा स्टार ऑल राऊंडर IPL 2024 सोडून मायदेशात परतला
19
'त्याने माझा विश्वासघात केला, आता लेकीसोबतही...', संजय कपूरबाबत पत्नी महीपने केला खुलासा
20
दादागिरी पडली महागात, मतदान केंद्रात मारहाण करणाऱ्या आमदारावर मतदाराने उगारला हात

'काश्मीरमध्ये हिंदू असते तर कलम 370 रद्द झाले नसते'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2019 2:35 PM

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे.

चेन्नई : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्याप्रकरणी माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर टीका केली आहे. जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर या राज्याचा विशेष दर्जा भगवा पार्टीने काढला नसता, असे पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे.  

भाजपाने आपल्या ताकदीच्या जोरावर जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द केल्याचा आरोप सुद्धा पी. चिदंबरम यांनी केला आहे. जम्मू-काश्मीर सध्या अस्थिर आहे आणि आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था त्याबाबत वृत्तांकन करत आहेत. परंतू, भारतातील प्रसारमाध्यमे जम्मू-काश्मीरमधील वृत्तांकन करताना दिसत नाहीत. भाजपा असा दावा करत आहे की, काश्मीरमधील परिस्थिती निवळली आहे. जर भारतीय प्रसारमाध्यमे काश्मीरमधील अस्थिरतेचे वृत्तांकन करत नसतील तर याचा अर्थ तेथील परिस्थिती स्थिर आहे असा होतो का? असा सवालही पी. चिदंबरम यांनी केला. 

याचबरोबर, देशातील सात राज्यांतील सत्ताधारी प्रादेशिक पक्षांवरही पी. चिदंबरम यांनी टीका केली. राज्यसभेत विरोधी पक्षांनी भीतीमुळेच आम्हाला भाजपच्या या निर्णयाविरोधात सहकार्य केले नाही. लोकसभेत आमच्याकडे बहुमत नाही हे आम्हाला ठाऊक आहे. मात्र, डीएमके, वायएसआर काँग्रेस, टीआरएस, बीजेडी, आप, टीएमसी, जेडीयू या सात पक्षांनी सहकार्य केले असते, तर विरोधी पक्षाला राज्यसभेत बहुमत मिळू शकले असते. हे निराशाजनक आहे, अशा शब्दांत पी. चिदंबरम यांनी संताप व्यक्त केला. 

जर जम्मू-काश्मीर हिंदूबहुल राज्य असते तर भाजपाने कधीच असा निर्णय घेतला नसता. त्यांनी फक्त जम्मू-काश्मीर मुस्लीमबहुल राज्य असल्यामुळेच हा निर्णय घेतला. माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्यात कधीच संघर्षाची स्थिती नव्हती, असेही यावेळी पी. चिदंबरम म्हणाले. 

टॅग्स :P. Chidambaramपी. चिदंबरमJammu Kashmirजम्मू-काश्मीरArticle 370कलम 370congressकाँग्रेसBJPभाजपा