शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

मिशन 'कोसा' ! जवानांनी 6 हजार पूरग्रस्तांना वाचवलं तर 2.5 लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 08:26 IST

सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत.

नवी दिल्ली - महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू राज्यांनाही पुराचा फटका बसला आहे. राज्यातील कोल्हापू, सांगली आणि सातारा येथे पुराच्या पाण्यामुळे हाहाकार माजला आहे. आलमट्टी धरणामधून साडेचार लाख क्युसेक विसर्ग सुरू झाल्याने कोल्हापुरात दोन फूट पाणी पातळी कमी झाल्याने पूरग्रस्तांना किंचीत दिलासा मिळाला आहे. या पूरपरिस्थितीत पूरग्रस्तांसाठी 60 हून अधिक स्वयंसेवी संस्था कार्यरत असून मदतीचा प्रचंड ओघ सुरू झाला आहे. तर, सैन्य दलाचे जवानही जीवाची बाजी लावून स्थानिकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढताना दिसत आहेत. 

ओडिसा, पंजाब व गुजरातमधील NDRFHQ चे 22, नौदलाच्या 26, तटरक्षक दलाचे सांगलीमध्ये 2 व कोल्हापुरात 9 पथके दाखल आहेत सैन्यदलाचे 8 पथके, राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे सांगलीमध्ये दोन तर कोल्हापुरात 1 अशी 3 पथके कार्यरत आहेत. तसेच कोल्हापुरात 76 व सांगलीमध्ये 90 बोटींद्वारे बचाव कार्य सुरू आहे. सैन्य दलाचे जवानांच्या कार्याचं स्थानिकांकडून डोळे भरून कौतुक होत आहेत. आमच्यासाठी आम्हाला वाचविणार सैनिकच देव असल्याची भावना तेथील लोकांकडून व्यक्त होत आहे.  

सांगलीमध्ये पूरस्थिती अद्यापही कायम आहे. मदतकार्याचा धडाका सुरू असला तरी, पूरस्थिती अद्यापही आटोक्यात येण्याची चिन्हे नाहीत. कोल्हापूरपेक्षाही आता शिरोळ तालुक्याची परिस्थिती अजूनही गंभीर राहिल्याने प्रशासनाने जिल्ह्यातूनही बोटी तेथे मागवल्या आहेत. कोल्हापूर शहर, चिखली, आंबेवाडी येथील पूरग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणावर मदत सुरू झाली आहे. अन्नधान्य, तयार अन्न, औषधे, कपडे, सॅनिटरी नॅपकिन इथंपासून ते अगदी पेस्ट, ब्रशपर्यंत अनेक जीवनोपयोगी वस्तू पुरवल्या जात आहेत.

शिरोळमध्ये जवळपास 120 लष्कराच्या जवानांनी चार बोटीच्या साहयाने मोहीम राबवली. आपल्या पायांना जखमा झाल्या तरीही, सैन्याचे जवान मलमपट्टी करुन आपले कर्तव्य बजावत आहेत. शासनाची मदत नसतानाही सेवाभावी संस्थामार्फत पूरग्रस्त्तांना जेवण, चहा, नाष्टा दिला जात आहे. महाराष्ट्रासह, केरळ, तामिळनाडूतही पूरस्थिती आहे. याही राज्यात सैन्याचे जवान पूरस्थितीशी लढताना दिसत आहेत. महाराष्ट्रासह केरळ आणि तामिळनाडू येथून सैन्यातील जवानांनी 6000 पूरग्रस्तांना वाचविण्यात आलं असून 15000 नागरिकांची सुरक्षितस्थळी रवानगी करण्यात आली आहे. त्यासाठी, पूरग्रस्त 4 राज्यातील 16 जिल्ह्यांमध्ये सैन्य दलाच्या 123 तुकड्या कार्यरत आहेत. 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKolhapur Floodकोल्हापूर पूरSangliसांगलीIndian Armyभारतीय जवान