शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

जवानांना आवश्‍यकतेनुसार जेवण, कपडे मिळत नाहीत; कॅगचा ठपका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2020 08:33 IST

जवानांच्या जिवाशी केंद्र सरकार खेळ करत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

नवी दिल्ली : सियाचिन, लडाख आणि डोकलाम यांसारख्या अतिउंच क्षेत्रात देशाच्या संरक्षणासाठी तैनात असणाऱ्या जवानांना आवश्‍यकतेनुसार जेवण मिळत नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे जवानांच्या जिवाशी केंद्र सरकार खेळ करत आहे की काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. 

सियाचिन येथील भागात तर वर्षभर बर्फच असतो. त्यामुळे याठिकाणी ज्याप्रकारच्या कपड्यांची गरज जवानांना भासते. ते कपडे खरेदी करण्यास सरकारला खूप उशिर झाला. तसेच, जुने स्पेसिफिकेशनचे कपडे आणि उपकरणे मिळाल्याने जवानांना चांगल्या दर्जाचे कपडे आणि उपकरणांपासून वंचित राहावे लागल्याचेही समोर आले आहे. 

सोमवारी संसदेत कॅगचा हा अहवाल मांडण्यात आला. या अहवालात जवानांना पुरेसे कपडे, बूट, स्लीपिंग बॅग आणि जेवणही मिळत नसल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. अतिउंच क्षेत्रात जवानांना रेशनचे विशेष स्केल त्यांची रोजची एनर्जी पाहून ठरविले जाते. म्हणजेच, जवानांना कॅलरीज्चे प्रमाण वाढवण्यासाठी खास जेवण आणि पर्यायी खाद्यपदार्थ दिले जाते. पण, संरक्षण मंत्रालयाने याकडे दुर्लक्ष केल्याचे कॅगचे म्हणणे आहे. 

पर्यायी वा पूरक अन्नपुरवठा न झाल्याने या जवानांच्या कॅलरीज्मध्ये तब्बल 82 टक्क्यांची घट झाल्याचे निरीक्षणही कॅगने नोंदवले आहे. याचबरोबर, 2017 मध्ये सियाचीनमध्ये कपडे आणि अत्यावश्यक सामान नसल्याच्या 64 हजार 131 तक्रारी संरक्षण मंत्रालयाकडे आल्या. मात्र बजेटच नसल्याने यातील खूप कमी तक्रारींचे निवारण झाल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे. 

नोव्हेंबर 2015 पासून सप्टेंबर 2015 पर्यंत जवानांना बूटच मिळाले नाहीत. संरक्षण मंत्रालयाने केलेल्या खरेदीतही घोटाळा असून जुने फेस मास्क, जुनी जॅकेटस् आणि स्लीपिंग बॅग्ज यांची खरेदी करण्यात आली आहे. मंत्रालयाच्या प्रयोगशाळेत संशोधनच होत नसल्याने अत्यावश्यक सामान आयात करावे लागत आहे.

टॅग्स :SiachenसियाचिनIndian Armyभारतीय जवान