शहरं
Join us  
Trending Stories
1
“ठाकरे पिता-पुत्राला जेलमध्ये पाठवण्याची तयारी संजय राऊत करतायत”; शिंदे गटाचा दावा
2
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
3
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
4
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
5
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
6
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
7
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
8
Gold Silver Price: अक्षय तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
9
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!
10
Baramati Lok Sabha Election 2024 : 'अजित पवार शब्दांचा पक्का, शब्द राखेल अशी आशा'; मिशी काढण्यावरून श्रीनिवास पवारांनी पुन्हा डिवचलं
11
धकधक करने लगा! अंकिताने केला माधुरीसारखाच हुबेहुब लूक, युझर्स म्हणाले, 'प्रयत्नही करु नको'
12
ज्या Naresh Goyal यांना मिळाला जामीन, एकेकाळी होता त्यांचा बोलबाला; होते देशातील १६वे श्रीमंत 
13
"वातावरण खूप चांगले आहे, आम्ही २५-२६ जागा जिंकू", मतदानानंतर बीएस येडियुरप्पांचा दावा
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५५ टक्के मतदान
15
“आमच्यासोबत होते म्हणून १८ जागा आल्या, आता काहीच येणार नाही”; भाजपाची ठाकरे गटावर टीका
16
किती कमाई होते?; अयोध्येत कपाळाला टिळा लावणाऱ्या पोराचं उत्तर ऐकून व्हाल हैराण
17
Video - "आमचा उमेदवार चोरीला गेला..."; माजी मंत्र्यांनी जनतेला केलं 'हे' आवाहन
18
बारामतीत नवा ट्विस्ट..! ऐन मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल
19
मतदानादरम्यान किरण सामंत नॉट रिचेबल, कार्यकर्ते संभ्रमात, रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये मोठा ट्विस्ट
20
"मराठी 'not welcome' म्हणणाऱ्यांना मत देऊ नका", गुजराती HRच्या पोस्टनंतर रेणुका शहाणेंचं ट्वीट

सिरसा येथील डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात घुसले लष्कर, रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2017 12:03 PM

पंजाब-हरयाणामध्ये कालच्या सारखी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे. 

पंचकुला, दि. 26 - डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीमला साध्वीवरील बलात्कार प्रकरणात सीबीआयने कोर्टाने दोषी ठरवल्यानंतर हरयाणा-पंजाबमध्ये मोठया प्रमाणावर हिंसाचार झाला होता. आज अशी परिस्थिती उदभवू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हरयाणामध्ये लष्काराने पाचारण केले आहे.  - हरयाणातील सिरसा येथी डेरा सच्चा सौदाच्या मुख्यालयात लष्कर आणि रॅपिड अॅक्शन फोर्सचे जवान घुसले आहेत. 

- केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह दिल्लीमध्ये उच्चस्तरीय बैठकीत पंजाब-हरयाणातील परिस्थितीचा आढावा घेत आहेत. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही उपस्थित आहेत. 

- काल झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला तर, 250 हून अधिक जखमी झाले होते. - हरयाणातील रोहतक जिल्ह्यातील सुनारीया येथील तुरुंगात गुरमीत राम रहीमला ठेवण्यात आले आहे. सामान्य कैद्यासारखीच त्याला वागणूक दिली जात आहे. 

- सिरसामधील आश्रमात हजारो डेरा समर्थक आहेत. - पंजाब, हरयाणामधील अऩेक भागात जमावबंदीचे कलम 144 लागू करण्यात आले आहे. 

- पंजाबच्या मानसामध्ये लष्कराने फ्लॅग मार्च केला. 

- कायदा-सुव्यवस्थेची स्थिती लक्षात घेऊन 23 ऑगस्ट ते 28 ऑगस्ट दरम्यान पंजाब-हरयाणाला जाणा-या 309 ट्रेन्स रद्द करण्यात आल्या आहेत. 

 हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांना भाजपा पक्षश्रेष्ठींनी दिल्लीत बोलावले आहे. गुरमीत राम रहीम यांच्या अटकेनंतर हरयाणामध्ये झालेल्या हिंसाचारामुळे त्यांना दिल्लीतून बोलावणे आले आहे. खट्टर यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जाऊ शकते. रिपब्लिक वाहिनीने हे वृत्त दिले आहे.  एकूणच खट्टर यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीला धोका निर्माण झाला आहे. हरयाणात पंचकुला आणि अन्य भागात शुक्रवारी जो हिंसाचार झाला त्यामध्ये 30 लोकांचा मृत्यू झाला तर, 250 पेक्षा जास्त जखमी झाले. 

प्रसारमाध्यमांनी हरयाणामधील या परिस्थितीसाठी मनोहर लाल खट्टर यांना जबाबदार धरले आहे. राज्य सरकारच्या निष्क्रीयतेमुळे ही परिस्थिती उदभवल्याचा आरोप प्रसारमाध्यमांनी केला आहे. मनोहर लाल खट्टर यांनी 26 ऑक्टोंबर 2014 रोजी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर तीनवर्षात तीनवेळा हरयाणात अशा प्रकारचा हिंसाचार झाला आहे. 

2014 मध्ये रामपाल नावाच्या बाबाला अटक करताना झालेल्या हिंसाचारात 10 जणांचा मृत्यू झाला होता. मागच्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात जाट आंदोलनाच्यावेळी 30 जणांना प्राण गमावावे लागले होते. आता गुरमीत राम रहीमच्या अटकेनंतर झालेल्या हिंसाचारात 30 जणांचा मृत्यू झाला. एकूणच महत्वाच्या प्रसंगी कायदा-सुव्यवस्था राखण्यात मनोहर लाल खट्टर सरकार अपयशी ठरले आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हा