शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

"भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनारही तोडणार आहेत का?"; खरगेंचा भाजपला सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 08:37 IST

दिल्लीत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपवर टीकास्त्र डागलं. 

संभल येथील शाही जामा मशीद आणि अजमेर येथील शरीफ दर्गा मुद्दा तापला आहे. याच मुद्द्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी भाजपच्या सर्वोच्च नेतृत्वावर निशाणा साधला. भाजप देशातील मशि‍दींचे सर्वेक्षण करून समाजात दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप खरगे यांनी केला. असे करून भाजप सरसंघचालक मोहन भागवत यांच्या भूमिकेलाच विरोध करत आहे, असेही ते म्हणाले. 

दिल्लीतील रामलीला मैदानात दलित, अल्पसंख्याक, आदिवासी आणि ओबीसी यांच्या एका संघटनेच्या वतीने रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीत बोलताना मल्लिकार्जून खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र डागलं. 

लाल किल्ला, ताजमहालही पाडणार का?

भाजपला लक्ष्य करताना मल्लिकार्जून खरगे म्हणाले म्हणाले, "भाजपचे नेते लाल किल्ला, ताजमहाल, कुतुब मीनार किंवा चार मीनार सारख्या वास्तूही पाडणार आहेत का? ज्या मुस्लिमांनी बांधल्या आहेत."

उत्तर प्रदेशातील संभलमध्ये मशि‍दीच्या सर्वेक्षणावरून हिंसा झाली. त्या पार्श्वभूमीवर खरगे यांनी हे विधान केले. संभलमधील शाही जामा मशि‍दीच्या ठिकाणी पूर्वी मंदिर होते, असा दावा करण्यात आला आहे. त्याच्या पाहणीसाठी सर्वेक्षण करण्यात येत आहे. 

खरगेंची मोदींवर टीका

मल्लिकार्जून खरगे यांनी म्हटले की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्वसामान्य माणसांविरोधात आहेत. कारण ते लोकांचा तिरस्कार करतात. आमची लढाई त्या द्वेषाविरोधात आहे आणि त्यामुळे राजकीय शक्ती महत्त्वाची आहे."

"प्रत्येक ठिकाणी सर्वेक्षण केले जात आहे. मशि‍दींच्या खाली मंदिरं शोधली जात आहेत. तशी मागणी जोर धरत आहे. पण, २०२३ मध्ये आरएसएस नेते मोहन भागवत यांनी म्हटले होते की, आमचा उद्देश राम मंदिर निर्माण करणे हे होते आणि आम्हाला मशि‍दींच्या खाली मंदिर शोधायची नाहीत", असे म्हणत खरगेंनी भाजपवर निशाणा साधला. 

खरगे म्हणाले, "आपण सगळे एक आहोत आणि तुम्हा सगळ्यांची हीच इच्छा आहे. नरेंद्र मोदी म्हणतात की, एक हैं तो सेफ है. पण, ते कुणालाही सुरक्षित जगू देत नाहीयेत. सत्य हेच आहे की, मोदीच फूट पाडत आहेत", अशी टीका खरगेंनी केली. 

टॅग्स :congressकाँग्रेसMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी