शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

विरोधकांची आघाडी राष्ट्रविरोधी-तालिबानी! भाजपा नेत्यांची वक्तव्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 2:04 AM

गोरखपूर, फुलपूर आणि त्यानंतर कैराना व अन्य पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे आणि कर्नाटकात येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागून, तिथे काँग्रेस-जनता दलाचे सरकार आल्यामुळे भाजपा नेते जणू बावचळून गेले आहेत.

नवी दिल्ली : गोरखपूर, फुलपूर आणि त्यानंतर कैराना व अन्य पोटनिवडणुकांमध्ये झालेल्या पराभवामुळे आणि कर्नाटकात येडियुरप्पा यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागून, तिथे काँग्रेस-जनता दलाचे सरकार आल्यामुळे भाजपा नेते जणू बावचळून गेले आहेत. त्यांनी आता विरोधक व त्यांची आघाडी राष्ट्रविरोधी आणि तालिबानी नेता ओसामा बिन लादेनचे समर्थक आहे, असे म्हणायला सुरुवात केली आहे. विरोधक व पाकिस्तानी अतिरेकी हफिज सईद या दोघांची तुलनाही भाजपा नेते करीत आहेत.आताच्या पराभवामुळे अनेक भाजपा नेत्यांना २0१९ च्या लोकसभा निवडणुकांत काय होईल, अशी भीती वाटू लागली आहे. त्यातूनच त्यांनी विरोधी पक्ष व त्यांच्या ऐक्यावर अशा प्रकारची टीका सुरू केली आहे. विरोधक हे माओवादी, जमीनदारी प्रवृत्तीचे (सामंतवादी), जातियवादी व लादेनवादी आहेत, असे भाजपाचे नेते खा. गिरीराज सिंग यांनी म्हटले आहे. अर्थात हे एकत्र आले तरी त्याचा आमच्यावर परिणाम होणार नाही आणि पंतप्रधान नरेंदझ मोदी यांच्या नेतृत्वाखाली २0१९ च्या लोकसभा निवडणुकांतही भाजपा व एनडीएचाच विजय होईल, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.गिरीराज सिंग नेहमीच अशी वक्तव्ये करीत असतात. त्यामुळे त्यांच्याकडे कोणी फारसे गांभीर्याने पाहत नाही. पण यावेळी त्यांनी केलेले आरोप अतिशय गंभीर स्वरूपाचे आहेत आणि विरोधकांच्या ऐक्याला यश मिळाल्यानेच केले आहेत, असे उघडपणे दिसते. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा हेही आता मागे नसून, त्यांनी विरोधकांची तुलना पाकिस्तानी दहशतवादी व मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार हफिज सईद याच्याशी केली आहे. हफिज सईदप्रमाणेच विरोधकांनाही पंतप्रधान नरेंद्र मोदी नको आहेत, असे ते म्हणाले. नंतर मात्र आपण विरोधक व हफिज सईद यांची तुलना करीत नाही, असेही त्यांनी सांगितले.पंतप्रधान मोदी यांनी भ्रष्टाचार व काळा पैसा याविरोधात कारवाई सुरू केल्यामुळेच सारे विरोधक मोदी यांना विरोध करू लागले आहेत. मोदी यांनी पाकिस्तानात लष्कर घुसवून सर्जिकल स्ट्राइक केल्यामुळे व ते दहशतवाद संपवू पाहत असल्याने हफिज सईद यालाही मोदी नको आहेत, या प्रकारे संबित पात्रा यांनी ही तुलना केली आहे.मौर्य यांना मुख्यमंत्री न केल्याने पराभवउत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांची जबाबदारी ज्या केशव प्रसाद मौर्य यांच्याकडे होती, त्यांच्याऐवजी योगी आदित्यनाथ यांना भाजपाने मुख्यमंत्री केल्यामुळे ओबीसी समाज भाजपावर नाराज आहे. त्यामुळेच त्यांनी पोटनिवडणुकांत भाजपाचा पराभव केला, असे विधान उत्तर प्रदेशातील मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी केली आहे. राजभर हे योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असून, ते सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे प्रमुख आहेत. या पराभवाला राज्य सरकारच कारणीभूत आहेत. आता तरी भाजपाने मौर्य की योगी हे नक्की करावे, असेही ते म्हणाले.

टॅग्स :BJPभाजपा